डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू !

Khozmaster
3 Min Read

 

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 

मोखाडा: तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत मधील

बोरीचीवाडी येथील एका सात वर्षाच्या चिमुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.छाया सखाराम भोई वय 7 वर्ष दिनांक 16- 5 -2023 रोजी संध्याकाळी 7: 30 दरम्यान अंगणासमोर चींचाच्या झाडा लगत खेळत होती .खेळत असतानाच तिथेच तिला सर्पदंश झाला. ही घटना तिच्या वडिलांना कळतात त्यांनी तात्काळ 8: 30च्या दरम्यान खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. एका तासाभराच्या कालावधीनंतर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीला काही झालेलं नाही. तिला सर्पदंश झालेला नाही खेळत असताना तिला दुखापत झाली असावी तिला घरी घेऊन जा असे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले असल्याचे तिच्या वडिलांनी बोलताना आरोप केला आहे .

यानंतर 9:30 वाजेच्या दरम्यान तिला तिच्या कुटुंबीयांनी घरी घेऊन गेले परंतु घरी पोहोचताच तिला मोटर सायकल वरच लघुशंका होऊन तिची तब्येत खालावली आणि पुन्हा तिला तिचे कुटुंबीय खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. यावेळी उपस्थित डॉक्टरने सांगितले की तिला तात्काळ मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करा इथे तिच्यावर उपचार होणार नाहीत . आणी लगेचच रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली. मोखाड्याकडे येत असताना अर्ध्या रस्त्यातच मात्र तिचा मृत्यू झाला

यामुळे माझ्या मुलीवर डॉक्टरांनी योग्य तो उपचार केला नाही .तिच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही डॉक्टरांना सांगत होतो की तिला सर्पदंश झाला आहे. परंतु डॉक्टरांनी मनावर घेतले नाही. माझ्या मुलीच्या मृत्यूला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरच जबाबदार आहेत असा माझा आरोप आहे .

याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मूर्त छाया चे वडील बाळू भोई यांनी केले आहे.याबाबत अधिक माहितीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वाघ याना संपर्क साधला असता त्यांनी कॉल उचलला नाही

पेशंट खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल झाल्यानंतर काही वेळातच बीटी सिटी टेस्ट करण्यात आली परंतु रिपोर्ट नॉर्मल आला यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्याना सांगितले 

 

तुम्ही कुठे जाऊ नका परंतु काही वेळाने पेशंटचे नातेवाईक तिला घरी घेऊन गेले आणि तब्येत खालावल्यानंतर पुन्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे घेऊन आले त्यानंतर तीला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले परंतु अर्ध्या रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल

भाऊसाहेब चत्तर _ तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती मोखाडा )

सर्पदंश झाल्यावर पेशंटचा मृत्यू का होतो ..?

सर्पदंश झाल्यानंतर पेशंटची बिटिसिटी टेस्ट तात्काळ करणे गरजेचं आहे या टेस्ट मुळे कोणत्या सापाने दंश केला आहे हे कळते परंतु हि टेस्ट वेळेत झाली नाही तर उपचाराला विलंब होतो आणि पेशंट दगावतो ….

 

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *