तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे भेट देऊन अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला
यावेळी महसूल मंडळ असलेल्या तुळजापूर या गावासह तालुक्यात सर्वात जास्त फटका अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा एकूण 13 गावांना बसला पहिलेच अल्पवृष्टीमुळे खरिपातील पीक हातचे गेले असताना कोरडा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अल्प पाण्यावर रब्बीतील पिकांची लागवड तसेच पेरणी केली होती हे पीक जगवत असताना रविवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तारांबळ उडाली त्यातच गारपिटीचा मारा एवढा होता की आलेला कपाशी पीक जमीन दोस्त झाले त्यामध्ये तूर हरभरा आणि इतर भागांचा सुद्धा तसेच फळवर्गीय भाजीपाला तसेच बागांचा समावेश होता
परिसरातील शेतकरी आधुनिक शेती करत असताना शेडनेटचा उपयोग करून त्यामध्ये बीज उत्पादन करून विविध कंपन्यांच्या माध्यमातून ची विक्री करतात आज रोजी एका शेतकऱ्याला एक शेडनेट उभे करण्यासाठी दोन ते अडीच लाखाचा खर्च येतो पण गारांच्या मारा पुढे सदर शेण येत नाही टिकाऊ धरला नाही क्षणात होत्याचे नव्हते झाले याचीच दखल घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे हे थेट तुळजापूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या त्यामध्ये विशेष प्राधान्याने विमा कंपनीचे 72 तासाच्या आत तक्रार करावी त्यांनाच विमा भेटेल असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले परंतु मुस्कान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर संबंधित एग्रीकल्चर विमा कंपनीचे सर्वर डाऊन होते त्यामुळे दिवसभर तक्रारी करता आल्या नाही त्यातून बहुतांश शेतकरी वंचित राहिले याची तक्रार दानवे यांच्याकडे नोंदणीचा तात्काळ त्यांनी जिल्हास्तरीय विमा कंपनी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीहून संपर्क साधून तात्काळ मुदत वाढवून देण्यास सांगितले यावर शेतकऱ्यांनी नोंदवतात शेतकऱ्यांना विमा कंपनीचा देण्यात यावा असा आग्रह धरला दानवे यांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये एक प्रश्न हा लावून धरून शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले
Users Today : 34