वाहतूक खाते मालामाल! ६ वर्षांत करोडो रुपयांची वसुली, साडेअकरा लाख नाशिककरांवर कारवाई

Khozmaster
3 Min Read

नाशिक : राज्यात रस्ते अपघातामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये शहर पोलिसांनी सहा वर्षांत साडेअकरा लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून तब्बल साठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी सहा लाख चालकांनी २५ लाख रुपयांचा दंड जमा केला असला, तरी अद्याप ३६ लाख रुपयांचा दंड थकीत आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकांना नोटीस देण्यासह ‘एनआयसी’ पायलट प्रोजेक्ट अंतर्गत पुढील कार्यवाहीला वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे.

नाशिक शहरात वर्षभरात सरासरी अडीच लाख बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होत आहे. त्यामध्ये विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, सिग्नल मोडणे, चुकीच्या दिशेने वाहने चालवणे, ट्रिपल शीट, रॅश ड्रायव्हिंगसह इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी वारंवार प्रबोधन करूनही बेशिस्त वाहने चालविणाऱ्यांची संख्या सहा वर्षांत साडेअकरा लाखांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सन २०१९ ते २०२१ या करोना कालावधीत प्रतिवर्षी सरासरी एक लाख चालकांनी ई-चलान अंतर्गत दंड भरला. मात्र, सन २०२२ मध्ये ७४ हजार चालकांनी दंड भरला आहे. थकीत दंड वसुलीसाठी पोलिसांमार्फत जागृती करण्यात येत आहे. तर थकीत दंड असलेल्या चालकांना लोक अदालतीमार्फत नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच पुढील टप्प्यात अधिक प्रभावी कारवाईकरीता एनआयसी प्रोजेक्ट अंतर्गत वाहन विमा कंपन्यांचा हप्ता भरताना ई-चलान दंड भरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा थकीत दंड सरकारी तिजोरीत विनासायाय जमा होणार आहे.

‘एनआयवर्ष : ठोठावलेला दंड :                                                                                             भरणा : थकीत
२०१७ – ५,५९,६०० – ४,५२,१०० – १,०७,५००
२०१८ – ३,०६,९७,२०२ – २,९६,०६,९०२ – १०,९०,३००
२०१९ – ६,००,५१,४५० – ४,३१,३३,८५० – १,६९,१७,६००
२०२० – ९,१७,९६,३०० – ४,०२,३६,९०० – ५,१५,३९,४००
२०२१ – १०,०३,३३,८५० – ५,०३ ,२५,८०० – ५,००,०८,०५०
२०२२ – १४,१९,३४,५५० – ६,२०,८२,८५० – ७,९८,५१,७००
२०२३ – १७,६७,९५,४०० – २,३९,८०,३५० – १५,२८,१५,०५०
एनआयसी : ५५,५७,९५० – १,७२,५०० – ५३,८५,४५०

सहा वर्षांत…

कारवाई : ११ लाख ५० हजार २९९
दंड : ६० कोटी ७७ लाख २६ हजार ३०२ रुपये
भरणा : २४ कोटी ९९ लाख ९१ हजार २५२ रुपये
थकीत : ३५ कोटी ७७ लाख १५ हजार ५० रुपये

लोक अदालतीच्या माध्यमातून आठ लाखांचा दंड वसूल झाला. एनआयसी संलग्न ई-चलान कार्यपद्धतीत पुढे वाहन विम्याची रक्कम भरताना दंडाचा भरणा करणे अनिवार्य असेल. वाहन खरेदी-विक्री करतानाही हाच नियम असेल. यासह कोर्टातून चालकांना नोटीसदेखील पाठविण्यात येतील. शक्यतो, तत्पूर्वीच वाहतूक पोलिसांकडे जात चालकांनी थकीत दंड जमा करावा.- सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखासी’ प्रोजेक्ट

शहरात नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) अंतर्गत ई-चलान कारवाईच्या पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामार्फत चालकांना मोबाइलवर ‘ॲलर्ट’ दिल्यावर दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत असेल. त्यानंतर सोळाव्या दिवशी पोलिसांमार्फत चलानची नोंद थेट कोर्टात होईल. त्यामुळे चालकाला कोर्टात जाऊन थकीत दंड भरावा लागेल. राज्यात प्रथमच नाशिकमध्ये ही कारवाई होत असून, त्यामार्फत नोव्हेंबर महिन्यांत ५५ लाखांचा दंड ठोठविण्यात आला आहे.

0 9 3 8 5 4
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *