|
1:50 PM (1 minute ago)
|
![]() ![]() ![]() |
||
|
||||
विद्यार्थ्यांनी विज्ञानवाद जोपासावा… प्रा. संभाजी तिडके
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथे शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य माणिकराव थिटे हे होते.
शिक्षकांनी स्वतः विज्ञानवादी राहून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवाद जोपासवा. आज समाजामध्ये ज्या अनुचित घटना घडत आहेत त्यासाठी सर्वांगीण विकास झालेले विद्यार्थी घडले पाहिजेत. भविष्यात विद्यार्थ्यांनी समाज व देश हितासाठी काम करावे. समाजातील अनिष्ट रूढी प्रथा याबद्दल शिक्षकांनी जनजागृती करावी. भारत देशाला पूर्वीपासून गुरु शिष्याची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा आजच्या काळातही टिकून राहिली पाहिजे. शाळा महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय असावा. यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. काळानुसार शिक्षकांनी आपल्यामध्ये बदल करून समाजा भिमुख शिक्षण द्यावे. संस्कार विद्यार्थी घडले तरच देशाला चांगले नागरिक मिळतील व देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन संभाजी तिडके यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका पाटील मॅडम, मस्के सर, शिंदे सर, आगाव सर उगले सर इंगोले सर शेळके सर रंजवे सर काकडे सर यांच्यासह अध्यापन खूप शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Users Today : 43