सूरजने निक्कीला दिले प्रेमाचे धडे! मम्मी पप्पा सांगतात,त्यांचं ऐकायला पाहिजे ,तो दहा मुली फिरवेल तुझं काय?

Khozmaster
3 Min Read

मुंबई– बिग बॉस मराठीचा हा सीझन आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदा कोण जिंकेल याचा अंदाज आपापल्या परीने लोक लावत आहे. यावेळच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी. तिने दुसऱ्या दिवसापासूनच घरात धिंगाणा घालायला सुरुवात केलेली. या घरात प्रत्येक जण तिचे शत्रू झाले परंतु अरबाज पटेल हा शेवटपर्यंत तिच्यासोबत होता. मागच्या आठवड्यात अरबाज पटेल से आश्चर्यकारक एलिमिनेशन झाले. अरबाज टॉप ५ मध्ये असेल असं घरातल्या स्पर्धकांना सुद्धा वाटलेलं मात्र कमी मतांमुळे त्याला लवकर घराबाहेर पडावं लागलं. अरबाज जात असताना निक्की धायमोकोलून रडत होती. तो गेल्यावरही तिला थोडंफार एकट वाटत होतं. पण नंतर झालेल्या फॅमिली विकमध्ये तिच्या आईने तिला जे काही सांगितलं त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.नुकत्याच झालेल्या फॅमिली वीक मध्ये निक्की ची आई तिला भेटायला बिग बॉसच्या घरात गेलेली त्यावेळी तिने आपल्या लेकीला सांगितले की, अरबाज कमिटेड आहे, त्याची एंगेजमेंट झालीये अशा गोष्टी घराबाहेर बोलल्या जात आहेत. अरबाज ची आई म्हणते की त्याने आधी दोन शो केलेले तेव्हा दोन मुली त्याच्या मागे घरी आलेल्या. त्यात आता तू तिसरी. अरबाजच्या घरच्यांनाही त्रास होतोय लोक नाव ठेवतायेत. आईने सांगितलेल्या गोष्टी ऐकून निक्कीला जबरदस्त धक्का बसला ‌. त्यानंतर तिने रागाच्या भरात अरबाजाचे कपडे व काही वस्तू कचऱ्याच्या पिशवीत भरून बिग बॉसला बाहेर फेकण्यास सांगितले.त्यानंतर या विषयावर सुरज आणि निक्की चर्चा करत होते. तेव्हा सुरज तिला काही गोष्टी समजावून सांगताना दिसला. सुरज म्हणाला की, तुझ्या डोक्यात जे आहे ना ते सगळं बाहेर फेकून दे, नाहीतर तुलाच त्रास होईल. तो दहा मुली फिरवेल तुझं काय? त्याची आई काय म्हणाली ते माहिती आहे ना. दोन पोरी त्याच्या घरी आल्या होत्या. आता तू तिसरी. असंच असतं पोरांचं. प्रेम कसं असावं माहिती आहे का? एकीवरच असावं आणि जिवापाड असावं. त्यांचं मन भरलं की सोडायचं ते मला फार खटकतं ‌. डोक्यात बाटल्या वगैरे फोडू वाटतात.
त्यांनी आपल्याला जीव लावलेला असतो. तू डोक्यातलं काढून टाक नाहीतर तुला त्रास होणार आणि तुझं त्यातच लक्ष लागणार. आपले मम्मी पप्पा सांगतात त्यांचा ऐकायला पाहिजे आपण. ते देव आहेत आपले हे कोण आहे? तू जन्म घेतलाय तिच्या पोटात.

त्यानंतर सुरजने निक्कीला थेट विचारलं की, त्याच्यावर प्रेम करते का तू? यावर निक्की म्हणाली तो मला आवडायचा. यावर सुरज म्हणाला की तुला वाटत होतं तो तुझ्यासाठी खूप करतोय पण त्याला तुझ्याबरोबर पुढे जायचं होतं मला तर तुझच फार प्रेम आहे असं वाटलं. त्याने तुला असाच सोडून दिलं होतं. तू पडली रडली त्याने डोळ्यातून पाणी आणलं का? गेला बाहेर….यावर निक्की सुद्धा म्हणाली की, तेच मला आश्चर्य वाटलं की मी एवढी ढसाढसा रडत होते आणि त्याच्या डोळ्यातून फक्त बाहेर जातानाच पाणी आलं. यावर सुरज म्हणाला – तुला त्रास दिला पागल करून तेरे नाम करून गेला..‌.
बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन हा १०० नसून केवळ ७० दिवसांचा असणार आहे त्यामुळे येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनाले पार पडेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *