पंतप्रधान Narendra Modi यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. जागतिक परिस्थिती, युद्धजन्य वातावरण आणि वाढती महागाई लक्षात घेता नागरिकांनी पुढील एक वर्ष संयमाने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. तसेच पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाचा वापर शक्य तितका कमी करण्याचेही त्यांनी सुचवले. भारताला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ परदेशातून आयात करावे लागतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांवर होत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
देशाच्या हितासाठी नागरिकांनी इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि संसाधनांचा मर्यादित वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भरतेवर भर दिला. संकटाच्या काळात प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
Users Today : 8