उमरखेड मतदारसंघ मध्ये जनतेतून उमेदवार तयार करणार लखन
मागील अनेक वर्ष पासून उमरखेड महागाव मतदार संघ हा विकास कामापासून कोसो दूर आहे रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या मतदार संघ मध्ये आहे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र जनतेचा…
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरमधून जीवघेणा प्रवास, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर परिसरातील एका आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क ट्रॅक्टर मधून प्रवास करून घरी आणण्यात आले हा सर्व प्रकार एका व्हिडिओमध्ये दिसत असून हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर…
कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू
अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तरुणीच्या अंत्यसंस्काराला तिच्या कार्यालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता, यावरून…
महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे क्रांतिकारी पाऊल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निरंतर चालू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
बुलढाणा : राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा महिलाभगिनींच्या मोठ्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. त्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमूलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिलाभगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येणारी ही योजना ठरली आहे. शासनाने ३३ हजार कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणा-या रकमेमुळे गरीबांना निश्चित मदत होत आहे. यापुढेही बळ मिळाले तर आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी, लखपती दीदी, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. बुलढाणा शहरात निर्माण करण्यात आलेले महापुरूषांचे पुतळे व विविध कामे सौंदर्यीकरण व विकासाला चालना देणारी आहेत. महापुरूषांच्या स्मारकामुळे नव्या पिढीला कायम स्फूर्ती मिळत राहील, असेही त्यांनी सांगितले. एक कोटी भगिनींना लखपती बनविणार- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यातही 1 कोटी महिलाभगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवास सवलत, मोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतक-यांना मोफत वीज, पीक विमा, सोलर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाने जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेला असून, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. योजनेमुळे ग्रामीण अर्थचक्राला गती – उपमुख्यमंत्री श्री. पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले, तसेच ग्रामीण अर्थचक्राला गती दिली आहे. या रकमेमुळे महिलाभगिनींना आत्मविश्वास मिळाला असून, छोटे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. राज्यात उद्योग- व्यवसायांचीही भरभराट होत असून, देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. बुलडाणा शहरात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे नवीन पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहतील, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप, तसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफीटेबल बुक आणि ‘राजमाता’ बोधचिन्हाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे, तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आमदार संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. महिलाभगिनींचा प्रचंड उत्साह आणि दाद समारंभात जिल्ह्याच्या कानाकोप-यातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर महिलाभगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात व मोबाईल टॉर्च उंचावून त्यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणींचे अभिवादन स्वीकारत मान्यवरांनी मंचावर प्रवेश केला. यावेळी अनेक भगिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या व त्यांच्यासमवेत सेल्फीही घेतली. मान्यवरांनीही सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला.
सोयगाव तलाठ्याकडून ई-पिक पाहणी नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित !
छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात अनेक गावातील तलाठी कडून ई-पिक पाहणी केली पण तलाठी सजा यांनी ई पिक पुढे अपलोड केले नसल्याने हजारो शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश विसर्जनानिमित्त आज वाहतुकीत बदल, कोणते रस्ते बंद, कोणते सुरु?
मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आणि घरांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला आज, गुरुवारी गणेशभक्तांकडून निरोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. विसर्जनासाठी महापालिकेकडून कृत्रिम…
काही मागण्या मान्य…पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार – रविकांत तुपकर
बैठकीत काय झाले...? सोयाबन-कापूस दरवाढीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री श्री.अमित शहा यांची भेट घेणार छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असून लाभ न…
September 8, 2024
शिरूर तालुक्यातील शिव पाणंद शेतरस्ते खुले न केल्यास तहसीलवर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते) शिरूर तालुका प्रतिनिधी:- फैजल पठाण शेवटच्या शेतकऱ्याला शेतीला…
मुसळधार पावसामुळे पिकाला फटका
पातूर तालुक्यातील चित्र : शेतकरी हवालदिल पिंपळखुटा : पावसाळा सुरू झाला तेव्हापासून पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे. मात्र गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पिकांना जबर फटका बसला…
पावसाळ्यात मोड आलेले कडधान्य खाऊन पडू शकता आजारी, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!
निरोगी राहण्यासाठी बरेच लोक मोड आलेले वेगवेगळे कडधान्य खातात. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरूवात हे मोड आलेले कच्चे कडधान्य खाऊन करतात. या कडधान्यांचे शरीरात अनेक फायदेही मिळतात. पण अनेकांना असा…
