सतेज पाटलांचं स्वप्न अखेर पूर्ण, पुइखडीत पाईपलाईनचं पाणी दाखल; कार्यकर्त्यांनी बंटीदादांना अभ्यंगस्नानच घातलं

Khozmaster
4 Min Read

कोल्हापूर: कोल्हापूरकरांचा बहुप्रतिक्षित महत्वाकांक्षी प्रकल्प थेट पाइपलाईन योजना अखेर पूर्णत्वाकडे गेली आहे. काळमवाडी धरणातूनतब्बल ५२ किलोमीटर थेट पाइपलाईनद्वारे पाणी पुइखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री अकराच्या सुमारास पोहोचल असून यामुळे कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्नान हे थेट पाईपलाईन होणार हे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर शहराला पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी काळमवाडी थेट पाइपलाइन योजना २०१३ साली मंजूर झाली तर २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कामाला सुरुवात झाली. हा प्रकल्प आमदार सतेज पाटील यांचा महत्वकांक्षी प्रकल्प होता. २०१४ ला सतेज पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न कित्येक अडथळे पूर्ण करून आज पूर्णत्वास आले आहे.कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळाव यासाठी मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना डिसेंबर २०१३ मध्ये थेट पाइपलाईन योजना आखण्यात आली होती. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शिफारशीनंतर या योजनेसाठी सुमारे ४८३ कोटीचा निधी मंजूर केला. आणि ऑगस्ट २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. गेली आठ, नऊ वर्ष या योजनेचे काम सुरू होते.या मध्ये अनेक सरकार बदलली आणि त्यामध्ये अनेक अडथळे येत गेले आणि योजना रखडत गेली.जॅकवेलच्या कामात वनविभागाने गुन्हे दाखल केल्याने अडथळा देखील निर्माण झाला. यामुळे कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईन मधून पाणी कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता.गेली दोन-तीन वर्षे तर यावर्षी दिवाळीची अंघोळ काळम्मावाडी योजनेच्या पाण्याने होणार असे सांगितले जात होते. आमदार सतेज पाटील यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी याकडे पाठपुरावा करत कामाला गती आणली. जुलै महिन्यात जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी जॅकवेलमध्ये आले आणि पहिला टप्पा पूर्ण झाला. तर काही दिवसांपूर्वी हे पुईखडी येथे येणार होते. मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाणी उपसा करणाऱ्या पंपिंग स्टेशन येथील मोटारची वायर कापून टाकल्याने पाणी येण्यास अडथळा निर्माण झाला होता. तर सोलापूरहून टेक्निकल टीम बोलवून घेत मोटर ची वायर नीट करून घेण्यात आली आणि आता रात्री अकराच्या सुमारास पाणी पुईखडी येथे पोहोचले. पाईपलाईनचं पाणी पुईखडी येथे दाखल होताच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जलपूजनसाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत हलगी च्या ठेक्यावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर सतेज पाटील यांना पुईखडी येथे अभंगास्नान घालण्यात आले. तर थेट पाईपलाईनचे पाणी घेऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाईला नेऊन अर्पण करण्यात आले.गेली दोन-तीन वर्षे तर यावर्षी दिवाळीची अंघोळ काळम्मावाडी योजनेच्या पाण्याने होणार असे सांगितले जात होते. आमदार सतेज पाटील यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी याकडे पाठपुरावा करत कामाला गती आणली. जुलै महिन्यात जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी जॅकवेलमध्ये आले आणि पहिला टप्पा पूर्ण झाला. तर काही दिवसांपूर्वी हे पुईखडी येथे येणार होते. मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाणी उपसा करणाऱ्या पंपिंग स्टेशन येथील मोटारची वायर कापून टाकल्याने पाणी येण्यास अडथळा निर्माण झाला होता. तर सोलापूरहून टेक्निकल टीम बोलवून घेत मोटर ची वायर नीट करून घेण्यात आली आणि आता रात्री अकराच्या सुमारास पाणी पुईखडी येथे पोहोचले. पाईपलाईनचं पाणी पुईखडी येथे दाखल होताच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जलपूजनसाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत हलगी च्या ठेक्यावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर सतेज पाटील यांना पुईखडी येथे अभंगास्नान घालण्यात आले. तर थेट पाईपलाईनचे पाणी घेऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाईला नेऊन अर्पण करण्यात आले.

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *