पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रुझर गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय ५०) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. सातारा अशी मृतांची नावं आहेत.
धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहन चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली.क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
Users Today : 16