कृष्णा खोऱ्याचे सर्वेक्षण कधी? सातारा, सांगली जिल्ह्यांना मिळणार ७ टीएमसी पाणी, प्रत्यक्ष सर्वेक्षण रखडले

Khozmaster
4 Min Read

पुणे : कोकणातून कृष्णा खोऱ्यात पाणी वळविण्याबाबत भीमा, नीरा खोऱ्यातील नद्यांचे सर्वेक्षण झाले आहे. कोयना, कृष्णा नद्यांमधील नकाशांवर सर्वेक्षण झाले असले, तरी प्रत्यक्ष स्थितीचे सर्वेक्षण कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या खोऱ्याचे सर्वेक्षण झाल्यास सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना सुमारे सात टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, कोणत्या खोऱ्यातील पाणी कुठे, कसे वळविणार याची माहिती प्रस्तावात देण्यात आली आहे.

कृष्णा आणि कोयना खोऱ्यातील नकाशाच्या आधारे (टोपोग्राफिकल) सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, त्या-त्या भागातील स्थिती काय असेल याचे सर्वेक्षण झालेले नाही. प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी अद्याप निविदाही काढलेल्या नाहीत, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले                                                                                          कोयना उपखोरे
– महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्याच्या वरील बाजूला कुंभरोशी येथे सुमारे साडेअकरा किलोमीटर लांबीचा कंटूर कालवा प्रस्तावित आहे.
– त्यातील पाणी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात २.९० किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे सोडण्याचे नियोजन आहे.
– महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिमेला घाटमाथ्यावर नागरमाची गावाच्या वरील बाजूला उपलब्ध होणारे पाणी पावसाळ्यानंतर कोयना धरणाच्या नाल्यात बोगद्याद्वारे सोडण्याचे नियोजन आहे.- नागरमाची धरणस्थळाजवळील दरीमध्ये साडेसात किलोमीटर लांबीच्या कंटूर कालव्यातून पावसाळ्यातील पाणी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. तेथे साडेपाच किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे.
कुकडी – घोड उपखोरे
– पश्चिमेकडील घाटमाथ्यावर हरिश्चंद्र गडाच्या दिशेला उपलब्ध पाणी पावसाळ्यात कंटूर कालव्याद्वारे पिंपळगाव जोगे धरणाच्या बंधाऱ्यात वळविण्यात येणार आहे.
– माळशेज घाटमाथ्यावर शेळकेवाडी येथील पाणी पावसाळ्यात कंटूर कालव्याद्वारे पिंपळगाव जोगे धरणाच्या बंधाऱ्यात सोडले जाईल.
– डोईफोडी नदीच्या भागातील डोणे गावाजवळ पाणी उपलब्ध होत आहे. तेथे संतुलन बंधारा प्रस्तावित असून, पावसाळ्यात बोगद्याद्वारे डिंभे धरणातील पाणी बुभ्रा नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे.                                                      भीमा-इंद्रायणी खोरे
– मावळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर पुणे-रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर उपलब्ध होणारे पाणी पावसाळ्यात कंटूर कालव्याद्वारे आंद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बोगद्याद्वारे सोडण्याचे नियोजन आहे.                                                        नीरा खोरे

– वेल्हे तालुक्यातील चंदर गावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील प्रत्येक दरीमध्ये वळण बंधारे प्रस्तावित आहेत.
– दोन्ही ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठवून ते बोगद्यातून भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात सोडण्याचे नियोजन आहे.
– महाड तालुक्यातील धनगरवाडी गावाच्या खालील बाजूला खरक नदीच्या भागातील नाल्यावर वळण बंधारा प्रस्तावित आहे.
– त्यातील पाणी पावसाळ्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यासाठी साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे.
– तिन्ही प्रकल्पांतील पाण्याची आवक क्रमवारीने नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे वाड्यावस्त्या; तसेच वन्यप्राण्यांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळू शकेल. छोट्या लाभक्षेत्रांना पाणी दिल्यास, अतिरिक्त पाणी वळविल्यास पूर नियंत्रण होऊ शकते. नौका, विहार, वॉटर पार्कमधून रोजगार मिळू शकेल. छोट्या वाड्या-वस्त्यांसाठी जलविद्युत निर्मिती होऊ शकेल.- वर्षा शहाणे, उपकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग- ‘आयएनएस शिवाजी सैनिक’ या प्रशिक्षण विभागातील रामनगर नाल्यावरील शिवसागर धरणसाठा ६३.९४ टीएमसी आहे. उर्वरित पाणी कोकणातील उत्तरा नदीतून वाहून जाते.

0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *