देशभरासह महाराष्ट्रातही हवामान सतत बदलत असून थंडी आणि हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना विशेष इशारा दिला आहे की, येत्या २ जानेवारीपर्यंत तापमान चांगले खाली राहणार असून गारठा कायम राहू शकतो.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, विशेषतः नागपूर, गोंदिया आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा १० अंशांखाली जाऊ शकतो. परभणी, धुळे, अहिल्यानगर आणि निफाडसारख्या भागांमध्येही थंडीचा कडाका राहणार आहे. हवामान विभागानुसार नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेव्हचा धोका वाढणार आहे.
मुंबईकरांसाठीही चिंता निर्माण झाली आहे, कारण शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा खराब झाली आहे. PM2.5 आणि PM10 प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक २७७ वर पोहोचला आहे. वडाळा, कुर्ला, बांद्रा, गोवंडी, परळ, बोरिवली, मालाड, दादर आणि कुलाबा येथे प्रदूषण अत्यंत जास्त आहे.
हवामान आणि प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असून, लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या त्रास असणाऱ्यांनी घराबाहेर जाणे टाळावे किंवा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण थंडी आणि प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Alert: 2 जानेवारीपर्यंत थंडी आणि प्रदूषणाचा इशारा
0
9
2
6
4
4
Users Today : 11
Leave a comment