मुंबई
राज्यात जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता १ कोटी ८९ लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रियेनंतर हा अंतिम आकडा स्पष्ट झाला असून सुमारे ५४ लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
योजनेच्या सुरुवातीला सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर शासनाकडून विविध स्तरांवर पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सुरुवातीपासूनच पात्रतेची काटेकोर तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
३० एप्रिल हा ई-केवायसी पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या १.८९ कोटींवर स्थिरावली. मार्च अखेरपर्यंत ६८ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले होते, तर एका महिन्यात आणखी सुमारे १४ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
पडताळणीदरम्यान अनेक महिलांनी निकषात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. विशेषतः सरकारी कर्मचारी असलेल्या काही महिलांनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांचा समावेश अपात्र यादीत करण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून योजनेची पडताळणी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने सुरू असून पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे.
Users Today : 21