जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली, धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
धाराशिव: सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील. अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना…
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंसह ७ उमेदवारांना निवडणूक अधिकार्यांची नोटीस, वाचा नेमकं प्रकरण
बीड: बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेले ७ उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम…
आरक्षण संपविण्याचा कॉंग्रेसचा डाव, अंबाजोगाईच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप
बीड : ‘मुस्लिमांच्या मतांसाठी व तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी एक धोकादायक खेळ खेळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण संपविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी…
बोगस मतदान होऊ देऊ नका, चेहरे पाहा…राम सातपुतेंच्या सल्ल्यानंतर विरोधी कार्यकर्ते आमनेसामने, मतदान केंद्रावर गोंधळ
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून चुरशीचं मतदान सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर…
धैर्यशील माने-सत्यजित पाटील समर्थकांचा मतदान केंद्रावरच राडा, शाब्दिक चकमक अन् हाणामारी, कारण काय?
कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना…
कोल्हापुरात मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः वयोवृद्ध मतदार दुपारी वाढत असलेले तापमान पाहता…
औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला दिलासा, स्थानिकांच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला…
प्रेयसीसोबत ब्रेकअप, तरुणाला संताप, रागाच्या भरात दुकान पेटवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूर : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने केलेल्या कृत्याने नागपूर हादरलं आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकान पेटवून दिलं आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली…
बस्तरवाडीवाल्यांनो, पाणी भरुन ठेवलं का? १२ तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा खंडित
नागपूर : महापालिका आणि ओसीडब्लूच्यावतीने खैरीपुरा पुलाजवळील ६०० मीटर व्यासाच्या वाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने बस्तरवाडी भागातील जलकुंभावर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. हा शटडाऊन आज बुधवार, ८ मे रोजी…
चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ; संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही, आठ दिवसांत ६३ ठिकाणी कॅमेरे
सिल्लोड : चोरीच्या घटना, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. आठ दिवसांत ६३ उत्तम दर्जाचे कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे…
