संख्या घटली :- ग्रामीण भागातील जेवणावेळीही झाल्या दुर्मिळ.सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव सध्या पितृपंधरवडा सुरू आहे मात्र या पंधरवड्यात ठिकठिकाणी पूर्वी ची दिसणारी धांदल आता दिसेनाशी झाली आहे इतकेच काय तर ने वैद्य काढून घरावर बराच वेळ पाव…पाव..चा गजर केल्यावरही काव काव आवाज ऐकण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे .ऐरवी पितृ पंधरवाडा म्हटल की सावळदबारा या ग्रामीण भागात हे पंधरा दिवस एकच चंगल असायची घरोघरी जेवणाची पंधरा दिवस घरी चूल पेटवायची गरज भासायची नसत. आज यांच्या इथे तर उद्या त्यांच्या इथे सारखे स्वयंपाकाला असायचे तर असलेल्या घरी हमखास 50 ते 100 लोकांना आमंत्रण असायचे भल्या पहाटेपासून महिला मंडळाचे स्वयंपाक करण्याची एकच धांदल चालायची सायंकाळपर्यंत पंक्तीचालायच्या वरण भात पोळी आमटी वड्या खिर वगैरे या काळाच्या ओघात पितृपंधरवडा झगमगाटात मागे पडला आहे विभक्त कुटुंब पद्धतीला आता पितृ पक्षाना जेवणावळीना घरघर लागली आहे.फक्त एक तितर पक्षी जवळच्या घरघर लागली आहे फक्त एक पितर जेऊ घालण्यावरच भर दिला जात आहे ना कुणाला मोबाईल मुळे पक्षाच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम झाला यांना पक्षाप्रमाणे कावळ्याची संख्याही झपाट्याने कमी होत आहे पितृपक्षात नैवेद्याला शिवण्याचा मान कावळ्याला आहे.त्यामुळे या दिवसात कावळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
Users Today : 14