दिपक मापारी, रिसोड – डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलगति कृष महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गत हराळ येथील शेतकऱ्यांना आंबा कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले. गोपाल राजेकर,अंकित वानखडे,अविनाश खंडारे, गोपाल कावारखे,यश गंध्रे, व संतोष उफड यांनी रामभाऊ टाले यांचं शेता मधे जाऊन शेतकऱ्यांना आंबा या पिकावर कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम अप्तुरकर, आर. एस. डवरे, प्रा. डी. डी. मसूडकर, प्रा. आर. वाय. सरनाईक तसेच प्रा. जी. बी. बाजड यांनी मार्गदर्शन केले
Users Today : 14