रसवंती चालकाने विसरलेले ६० हजार रुपये ग्राहकास केले परत तुकाराम शिंगणे यांचा प्रामाणिकपणा

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव मही:-( तालुका प्रतिनिधी )

जगात प्रामाणिक लोक फार कमी बघायला मिळतात. अशातच रसवंतीत ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलेले ग्राहक आपले ६० हजार रुपये रोख व २० लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या रसवंतीतच विसरले. मात्र, रसवंती चालक तुकाराम शिंगणे यांनी उपरोक्त ग्राहकास फोन लावून उपरोक्त पैसे व बॅग परत करुन प्रामाणिकतेचे दर्शन घडविले.देऊळगावमही येथील सामाजिक कार्यकर्तेश्री तुकाराम महाराज शिंगणे यांची खडकपूर्णा नदीजवळच साई रसवंती आहे. रसवंती महामार्गावर असल्याने रात्रंदिवस वाहतूक सतत सुरू राहते. सद्या कडक उन्हाळा सुरु असल्यामुळे त्यांच्या रसवंतीत भरपूर प्रवासी थांबतात. १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान विठोबा श्रीपत चित्ते (रा.निमगाव गुरु) हे देऊळगाव मही येथे आले होते. कामे आठोपून ते घरी परत जात असतांना सदर रसवंतीवर रस पिण्यासाठी थांबले. रस पिल्यानंतर घाईगडबडीत साठ हजार रूपये रोख व २० लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या रसवंतीत विसरले. बऱ्याच वेळ टेबलवर पडून असलेल्या बॅगकडे तुकाराम महाराज शिंगणे याचे लक्ष गेले. त्यांनी सदर बॅग उघडून बघितली असता, त्यामध्ये त्यांना पैशाचे बंडल दिसले. त्यांनी सदर बॅग जावई कैलास उगले यांच्याजवळ दिली.बॅगमध्ये काही ओळखपत्र किंवा ओळख पटण्याजोगे काही कागदपत्रे पाहण्यास सांगुन ओळख पटल्यास संबंधीत व्यक्तीला फोन करण्याचे सांगितले.उगले यांना बॅगमध्य विठोबा श्रीपत चित्ते यांचा मोबाइल नंबर मिळून आला. त्यांनी त्यावर संपर्क करुन ‘तुमची बॅग रसवंतीत विसरुन राहील आहे, येवून घेऊन जा’, असे सांगितले आणि चित्ते यांना साठ हजार रोख व २० लाख रुपयांच्या मुदत ठेव पावत्या परत करुन आपल्या प्रामाणिकतेचं दर्शन दिले. त्यावेळी डॉ. गायकवाड, गणेश खेत्रे, विष्णू सागोते, पवन मापारी, ओम आदबणे उपस्थित होते.

0 9 5 2 2 1
Users Today : 169
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *