साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी
येथील सरपंच सुमनताई जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाबर आज सरपंच पदासाठी निवडणूक शाली असता सौ ज्योती अमित जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली, यावेळी तीन ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते. साखरखेर्डा ग्रामपंचायत डॉ राजेंद्र शिंगणे समौत राष्ट्रबादी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस अशी युती मिळून १६ सदस्य आहेत प्रथम सरपंच होण्याचा मान दाऊद कुरेशी यांना मिळाला. त्यानंतर सुमनताई सुनील जगताप यांनी दोन वर्ष ९ महिने कारभार सांभाळला त्यांनी ११ मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू सरपंच म्हणून उपसरपंच सय्यद रफीक यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता आज नायच तहसीलदार डॉ प्रविष्ण बन्हाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली सहाय्यक म्हणून तलाठी प्रशांत पोंधे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे होते ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना सी ज्योती अमित जाधव यांनी आणि संतोष श्रीकिसन जैस्वाल यांनी अर्ज दाखल करण्यासाठी घेतले असता १२ वाजेपर्यंत फक्त सौ ज्योती जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रोसिडींगचे वाचन केले, यावर कुणाला हरकत असेल तर कळवावे यावेळी उपस्थित १४ सदस्यांनी सर्वानुमते अनुमती दिली आणि अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी माजी सरपंच सुमनताई जगताप, आयुब कुरेशी, उल्हास देशपांडे, सौ अंकिता संग्रामसिंह राजपूत शेख युनुस शेख यासीन, सुरख्याबी मुस्तफा शहा श्रीमती कौसल्याबाई त्र्यंबक मंडळकर शारदा प्रविण पाझडे, सौ गंगुबाई कमलाकर गवई, सय्यद रफीक सय्यद अक्रम सौ लीलाबाई श्रीपत ठोके देवानंद खंडागळे यांनी सौ ज्योती अमित जाधव यांना पाठिंबा दिला. यावेळी संतोष.
Users Today : 206