औरंगाबाद,भारताचा मूळ धम्म म्हणून डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला : डॉ. प्रदिप गोखले

Khozmaster
2 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद गौतम बुद्धांनी प्रज्ञा करुणेतून दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. आदर्श भिख्शू कसा असावा याची आचारसंहिता निर्माण केली व सर्वसामान्य लोकांना आपले तत्त्वज्ञान साध्या व सोप्या भाषेत सांगितले. त्यामुळे आधुनिक कालखंडात ईश्वरवादाला नाकारत बौद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला असे प्रतिपादन डॉ. प्रदिप गोखले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गौतम बुद्ध अभ्यासन केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिशा घेऊन 66 वर्ष पुर्ण झाल्यामुळे त्यांनी केलेले धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. “बौद्ध तत्वज्ञानातील स्थित्यंतरे व डॉ. बाबासाहेब अविडकरांचा धम्म’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील तत्वज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रदिप गोखले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी बुद्धांनी तीन धर्मचक्र परिवर्तन केले ती सारनाथ, राजगृह, वैशाली येथील वर्णने नागार्जुन व त्याचा योगाचार, दुःख, मौन, दिग्नाग, वास्तववादी संकल्पना, जातीभेद, महायान ते तंत्रज्ञान पंथाचा प्रभाव, अत-दिप-भव जीवनातील विविध समस्यांचे निराकरण त्याचे यथार्थ चित्रण स्पष्ट केले.पंथांचा अभ्यास करून त्यांनी साध्या व सोप्या भाषेत सामान्यजनांना बुद्ध धम्म देऊन भारतात एक नवक्रांती केली असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु श्याम शिरसाट यांनी बौद्ध धर्माचे जे तत्वज्ञान आहे ते सम्यक सम बुद्ध असून त्याचा आधुनिक कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार करून त्यांनी भारतीय समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्याख्यानाची भूमिका गौतम बुद्ध अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. संजय मून यांनी मांडली तर सुत्रसंचालन डॉ. रेखा मेश्राम यांनी केले. आभार डॉ. संजय पाईकराव यांनी मानले या कार्यक्रमाला यशवंत भंडारे, प्राचार्य यशवंत खडसे, डॉ. प्रज्ञा साळवे, अनेक धर्माचा अभ्यास करून भारतीय मातीतील डॉ. क्षमा खोबागडे, डॉ. किशोर सूर्यवंशी, डॉ. सचिन धम्मच स्वीकारण्यांमागची अनेक कारणे सांगितली. बनसोडे, डॉ. सुशिल कांबळे, श्री. प्रकाश तुपे, डॉ. रवी त्यामध्ये बुद्धाचा वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून खिल्लारे, अर्जुन पट्टेकर, सुरेश मादळे, राहुल बचाटे, भारतीयांना नवयान बुद्धीझम दिला. बौद्ध धर्मातील सर्व निलेश जाधव व शहरातील मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती संपादक दशरथ सुरडकर यांनी बोलताना सांगितले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *