पातूर येथे संवाद सभा यंदाचा सम्राट अशोक महोत्सव भारतासाठी. दिशादर्शक ठरेलप्रा विजय आठवले

Khozmaster
3 Min Read

ग्रामीण प्रतिनिधी सुखलाल उपर्वट

भारतातील सुवर्ण युगाचे निर्माते,लोककल्याणकारी महान शासक सम्राट अशोक यांचे भारताच्या शैक्षणिक सामाजिक. सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय जडणघडणीत प्रचंड योगदान आहे,त्यांची जयंती राष्ट्रीय पर्व म्हणून घोषित व्हावी ,त्यांचे कार्य जनमानसात पोहचावे यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने यंदा सम्राट अशोक महोत्सव साजरा करण्यात येत या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून दिल्ली येथील धम्म दीक्षा क्रांतीचे शिलेदार माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहणार असून भदंत ज्ञानज्योती महाथेरो प्रमुख वक्ते असणार आहेत, त्यामुळे यंदाचा अशोक महोत्सव हा संपूर्ण भारतासाठी दिशादर्शक ठरणार असून प्रचंड प्रतिसादात यशस्वी होईल असे प्रतिपादन सम्राट अशोक प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा विजय आठवले यांनी केले पातूर येथे सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने आयोजित अशोक पर्व महोत्सव,संवाद व नियोजन सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक प प्रतिष्ठानचे सचिव प्रा सुनील कांबळे सर हे होते तर याप्रसंगी उपाध्यक्ष प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे ,व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे, प्रा डॉ संदीप भोवते विद्याधर मोहोड इत्यादी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती पुढे बोलताना प्रा आठवले यांनी सम्राट अशोक यांच्यामुळेच बौद्ध धम्माचा मानवतावादी विचार जगभर प्रसारित झाला ,सम्राट अशोक यांचे अशोक स्तंभ,अशोक चक्र हे. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारली आहेत त्यांच्या लोककल्याणकारी धोरणाचा भारतीय संविधान वर सुद्धा प्रभाव असून अश्या महान सम्राटाची शासकीय जयंती भारतात. साजरी केल्या जात नाही हे दुर्दैव आहे असे सुद्धा म्हटले. प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे यांनी* सम्राट अशोक यांच्या यांच्या देदीप्यमान कार्याची ओळख,समाजात व्हावी म्हणून या वर्षी सुद्धा सम्राट अशोक पर्व महोत्सव चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे हा महोत्सव प्रचंड ताकदीने साजरा व्हावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले संस्थेचे सचिव प्रा सुनील कांबळे , प्रा शैलेश इंगळे यांनी पातूर तालुक्यातील एक हजार लोकांचा अशोक पर्व महोत्सवात सहभागअसेल अशी ग्वाही दिली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी. प्रा विजय वाठोरे,प्रा प्रदीप करते ,प्रा शालीग्राम सरदार , प्रा रमेश बळकार प्रा दिवाकर. भोगे महेंद्र खंडारे सर त्रिरत्न इंगळे राजेश इंगळे. सर नागेश भाऊ. करवते प्रा योगेंद्र बोरकर. सर राजेश आ. इंगळे आनंदा. डोंगरे सर. प्रा संघपाल सोनवणे प्रा चंद्रमणी धाडसे दिनेश कंकाळ सर प्रा प्रवीण इंगळे आनंदा डोंगरे सर,चंद्रमणी धाडसे सर प्रा विनय खंडारे इत्यादींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजय वाठोरे यांनी तर संचालन व आभार चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे यांनी मानले

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *