
दिपक मापारी, रिसोड/वाशीम जिल्ह्यातील अडोळी फाटा ते भगवती या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करने खुपचं महत्वाचे झाले आहे या रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याचे डांबरीकरण होणेसाठी राजकिय मंडळींनी लक्ष देउन जनहिताचे कार्यास हातभार लावला तर या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना समाधान मिळेल जर ह्या रस्त्याकडे लक्ष न दिल्यास कंबरेचे दुखने वाढत जाणार व या रस्त्यावरच्या प्रवाश्याची आर्थिक परिस्थिती खालावणार याकडे राजकीय मंडळी लक्ष देणार केव्हा ? हा यक्ष प्रश्न प्रवाश्यांना पडला.हा रस्त्याची अवस्था खराब झाल्याने काही प्रमाणात प्रवाशी अडोळी एकबुर्जी वांगी वाशीम या मार्गाचा उपयोग करत आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन त्वरित कामास प्राधान्य द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरु यांनी केली आहे.
Users Today : 22