डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामधील एक खासदार कल्याण लोकसभेचा असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपण दर वेळेला सहकार्य करता. या वेळेला हे मताधिक्य मोठे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सर्वांना ही विनंती केली आहे. हा महाराष्ट्र उत्तरप्रदेश नंतर सर्वात जास्त खासदार देणारे राज्य आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण काम करूया, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
नीलेश राणे काय म्हणाले होते?
दसऱ्याच्या दिवशी ‘एक्स’वरून (आधीचे ट्विटर) नीलेश राणे यांनी आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली. ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही. मागच्या १९ ते २० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम मिळाले आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी खूप नशीबवान आहे,’ असे राणे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. ‘मी एक लहान माणूस आहे. पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही, तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत-नकळत मी काही लोकांना दुखावले असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा,’ असेही राणे यांनी नमूद केले.
Users Today : 27