आश्चर्यकारक! अख्ख्या राज्यात नाही पण वाशिमच्या एकाच गावात अवकाळी पाऊस, सत्य वाचून हादराल…

Khozmaster
2 Min Read

वाशिम : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्व जिल्ह्यांमध्ये दिलासादायक पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट पाहायला मिळालं. अशात वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये चांदस महसूल मंडळात एक विचित्र प्रकार समोर आहे. कारण, इथे अचानक अवकाळी पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलं. राज्यात कुठेही पाऊस नसताना अचानक १३ आणि १४ ऑक्टोबरला इथे अवकाळी पाऊस झाला.मिळालेल्या माहितीनुसार, महसूल मंडळात १३ व १४ ऑक्टोबरला अनुक्रमे ५८ ते १३७ मिलीमीटर पाऊस दाखवून आपत्कालीन विमा पिक विमा योजनेतून भरपाई लाटण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे. प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेमध्ये अवकाळी पाऊस पडल्याचे दाखवून शेतकऱ्यांना भरून भरपाई मिळवून देतो, असं आश्वासन काही विमा माफिया केलं आणि यातून राज्य सरकारची लूट करत असल्याचे स्पष्ट झाले.राज्यातून मान्सून माघारी परतला असून सध्या सर्वत्र कोरडं हवामान आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात चांदस महसूल मंडळामध्ये १३ व १४ ऑक्टोबरला अवकाळी पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलं. या ठिकाणी असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंद करण्यात आली होती.

राज्यात कुठेही पाऊस नसताना फक्त या मंडळात पाऊस कसा झाला? असा प्रश्न कृषी विभागाला पडला आहे. मात्र, या संदर्भात संपूर्ण चौकशी केली असता विमा यांनी या स्वयंचलित हवामान केंद्रात पाणी टाकून पाऊस पडल्याचं दाखवलं. याच आकडेवारीचा आधार घेऊन ही विमा माफिया टोळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतो असं सांगत कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे सांगते. पिक विमा योजनेच्या निकषानुसार, ७२ तासांच्या तक्रार करावी लागते. यातून काही टक्के आम्हाला द्या असा व्यवहार ठरल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.

0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *