स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी दोन संघटनांची घोषणा केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर समाजबांधवांसोबत धडक देणार असल्याचे पडळकरांनी स्पष्ट केले.
पडळकर म्हणाले की, धनगर जागर यात्रा मी सुरु केल्यानंतर लबाड लांडग्याच्या पिलावळींनी विष पेरायला सुरवात केली. गोपीचंद पडळकर एका बाजूला धनगर आरक्षणाची लढाई उच्च न्यायालयात सुरु आहे म्हणत आहे आणि दुसरीकडे जागर यात्रा काढत आहे अशी टीका केली. पण महाराष्ट्रातल्या धनगराच्या आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत आहे. गेल्या ७० वर्षात धनगर समाजावर जितका अन्याय झाला तितका अन्याय कधी झाला नाही. धनगरांच्या बाजूने सरकारने शपथपत्र न्यायालयात दिले आहे. त्यामुळे न्यायालय आपल्या बाजूने निकाल देईल अशी अपेक्षा आहे.
बहुजन समाजात बुरखा पांघरलेला लबाड लांडगा हा फूट पाडत आहे. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच या लबाड लांडग्याचा पुतण्या पार्टीतून फुटला यात दुसऱ्यांचा काय दोष असे म्हणत शरद आणि अजित पवारांना लक्ष्य केले. या लांडग्याला माहित नाही की, जर बहुजन समाज एकत्र झाला तर याचे काय होईल असे पडळकर म्हणाले.भटक्या विमुक्त आणि वंचित घटकासाठी काम करेल. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली दिवाळी पालावर राहणाऱ्या भटक्या समाजबांधवांबरोबर साजरी करावी असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
सरकारने २९ दिवसांत कमिटी स्थापन करावी अन्यथा २९ दिवसानंतर जर धनगर समाज रस्त्यावर उतरला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत लवकरात लवकर कमिटी स्थापन करावी, त्या कमिटीचा अहवाल तातडीने घ्यावा येत्या ३० दिवसात कमिटी स्थापन करून अहवाल नाही दिला तर राज्यातील धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.धनगर आरक्षणासाठी २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे पडळकरांनी जाहीर केले आहे. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर रोजी राज्यातील धनगर बांधवांना घेऊन अधिवेशनात धडक देणार असल्याचा इशाराही दिला आहे.
Users Today : 9