नांदेड-नागपूर एसटी पैनगंगेच्या पुलावर अडवली, पेट्रोल टाकून बस पेटवली, ७३ प्रवाशांसोबत काय घडलं?

Khozmaster
3 Min Read

यवतमाळ: नांदेड वरून नागपूरला जात असलेली नांदेड आगाराची एसटी बस [ एम एच २० -जीसी ३१८९] उमरखेड जवळ पैनगंगा नदीवरील पुलावर काही अज्ञातांनी पेटविल्याने खळबळ उडाली आहे . सुदैवाने बस मधील सर्वच ७३ प्रवाशी खाली उतरल्याने अनुचित घटना घडली नाही . नांदेड – नागपूर बस नांदेड वरून रात्री नऊच्या दरम्यान निघाली होती. रात्री ११ च्या दरम्यान बस यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत येत असताना उमरखेड तालुक्यातील गोजेगाव जवळ पैनगंगा नदीच्या पुलावर बस येताच मोटारसायकलवर येणाऱ्या काही जणांनी बस थांबविली . बसचा चालक बी .डी. नाईकवाडे यांनी बस थांबवली असता काही जण बसजवळ धावत आले . काही तरी विपरीत घडणार असल्याचे लक्षात येताच बस मधील सर्च च ७३ प्रवासी बस मधून खाली उतरले . सर्व प्रवासी ,बसचा चालक , वाहक खाली उतरताच त्याठिकाणी असलेल्या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली .

काहीवेळातच बस जाळून खाक झाली . रस्त्यातच बस पेटल्याने नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक बंद पडली . घटनेची माहिती मिळताच नांदेड व उमरखेड येथील एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले .उमरखेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . रात्री उशिरा बस रस्त्याच्या बाजूला केल्यावर वाहतूक सुरु झाली . बस पेटविणारे अज्ञात लोक कोण होते याचा शोध पोलिस घेत आहेत .

बस पेटविण्याच्या घटनेमागे मराठा आंदोलक असण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या उमरखेड तालुक्यात मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून तालुक्यात आंदोलन सुरु आहे . मनोज जरांगे याना पाठिंबा म्हणून अनेक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे त्यामुळे मराठा समाजचे आंदोलक या घटनेमागे असल्याची चर्चा आहे . ३० ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा निषेध म्हणून बस पेटविण्यात आल्याची शंका व्यक्त होत आहे .रात्री बस पेटवण्यापूर्वी गाजेगाव येथे काही जणांनी बस अडविण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने बस थांबविली नाही त्यानंतर त्या लोकांनी बसवर दगडफेक केली व बसचा पाठलाग करून बस पुलावर अडविली व पेट्रोल टाकून पेटवून दिली . घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी , ठाणेदार शंकर पांचाळ आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले . उमरखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यावर काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली व त्यांनी बसची आग विझविली पण तोपर्यंत बस जाळून खाक झाली होती. बसचे ३२ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्याअधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिली. रात्री बस बाजूला केल्यावर ३ वाजतात वाहतूक सुरळीत सुरु झाली . बसमधून उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसमध्ये बसविण्यात आले.

0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *