स्पर्धा परीक्षेचा पाच वर्ष अभ्यास पण पदरी अपयश, निराश न होता माळरानावर फुलवली फळबाग, मराठवाड्यात सफरचंद-काजूची लागवड

Khozmaster
2 Min Read

नांदेड : माळरानावर फळबागेची शेती करणे हे जिकरीचे काम आहे. अगदी खरे सांगायचे तर वादळात दिवा लावण्यासारखे कठीण काम असतं. मात्र, नांदेडच्या भोसी गावातील उच्च शिक्षित शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी या सर्व संकटांशी हिंमतीने सामना केला. अत्यंत चिकाटी, धाडस व चातुर्याने माळरानाच्या शेतीत यशस्वी प्रयोग केले आहे. १० एकर माळरान जमिनीवर केवळ अंबा, पेरू, चिकू, जांभूळ, डाळिंब, सीताफळ, रामफळ, एव्हढच नाहीतर काजू, सफरचंद, अंजीर, विलायची यशस्वी लागवड करून लाखोंचे उत्पन्न काढले आहे.

शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. सलग पाच वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परंतु यात त्याला यश आले नाही. दरम्यान कोरोना काळात ते गावाकडे परतले. आपल्या १० एकर माळरान जमिनीवर त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. एरव्ही या माळरानावर कुठलही पीक येत नव्हते. नंदकिशोर यांनी या जमिनीत फळबाग लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. माळरानावर फळबाग फुलवणे हे जिकरीच असतं, त्यामुळे त्यांना अनेकांनी वेड्यात काढलं. परंतु जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नंदकिशोर आपल्या निर्णयावर ठाम राहत माळरान जमिनीवर फळबाग लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.सध्या या शेतीत अंबा, पेरू, चिकू, काजू, जांभूळ, डाळिंब, सीताफळ, रामफळ, एव्हढच नाहीतर सफरचंद, अंजीर, विलायची, असे जवळपास ५० हुन अधिक फळांची झाडे आहेत. यात पेरुची ३ हजार झाडे, अंबा १ हजार, काजू ५००, लिंबू १ हजार झाडे असून मागील वर्षी पेरूच्या उत्पादनातून १३ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी नंदकिशोर यांनी सांगितले. यावर्षी देखील पेरूच्या उत्पादनातून जवळपास २० लाखाहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे. तसेच अंबा, काजू, जांभूळ डाळिंब सीताफळ रामफळ या फळबागे पासून मिळणारे उत्पन्न देखील लाखो रुपये आहे. या तरुण शेतकऱ्याला त्याचे आई-वडील देखील शेतीत मदत करत असतात.सक्षम सिंचनाची तयार केली व्यवस्था

नंदकिशोर यांनी सुरूवातीला माळरानावर पीक लागवड करण्यापूर्वी सक्षम सिंचनक्षमता तयार केली. माळरानावर विहीर खोदली. त्यानंतर माळराणाखाली बोअर पाडून विहिरीमध्ये सोडले. सुक्ष्म सिंचन व्यवस्था तयार केली. तसेच उत्पादित मालाला स्थानिक बाजारपेठे सोबतच जिल्हा शेजारील परभणी, हिंगोली या ठिकाणी सुद्धा मागणी आहे, असे नंदकिशोर सांगतात. दरम्यान नांदेड जिल्ह्यात एकीकडे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असताना नंदकिशोर यांनी माळरानावर राबवलेला यशस्वी प्रयोग हा प्रेरणादायी आहे.

0 9 5 0 6 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *