स्व.इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त स्थानिक के.जी. एन.फँक्शन हॉल येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी हे होते.कार्यक्रमात स्व.इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळेस प्रा.ओमराज गजभिये यांनी आपल्या अभ्यास पुर्ण भाषण यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.तसेच कासम भाई गवळी यांनी इंदिराजी गांधी यांनी भारत देशासाठी केलेल्या सुधारणा तसेच देशासाठी केलेले बलिदान या बाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच सरदार वल्लभ भाई पटेल यांचेही देशासाठी केलेले कार्य विषद केले.या कार्यक्रमाला प्रा.ओमराज गजभिये,भीमशक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोर दादा गवई मा .नगर सेवक तसेच काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश मानवतकर,मुजिब हसन कुरेशी, निलेश मानवतकर ,निलेश सोमण,इब्राहिम रेघीवाले, गजेंद्र माने सर ,स्मित सावजी, बाळू ससाणे ,जयदीप देशमुख, अनिल चांगाडे ,प्रल्हाद कानोडजे,विजय देवडे, महेबूब गवळी,विजय म्हस्के,सुरेश मुळे,पवन डोंगर दिवे, विजय वायाळ,राजू देबाजे, सद्दाम भवानीवाले,सद्दाम नानगीवाले,सुभान गवळी, आसिफ पठाण, लल्ला गवळी यांची तसेच कॉंग्रपक्षाच्या ,नेते पदाधिकारी ,आणि कार्यकर्ते व सर्व सेलचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती .
Users Today : 14