हिंगोली: मोबाईलमुळे अनेक दुर्घटना घडतात. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आठ विद्यार्थी घेऊन निघालेल्या ऑटो चालकाला अचानक फोन आला. त्याने फोन करणाऱ्याला फोन लावताच क्षणी थेट ऑटो पुलाच्या डिव्हायडरला जाऊन धडकला. यामध्ये शाळकरी विद्यार्थी बाल बाल बचावले आहेत. तर ऑटो चालक आणि चार विद्यार्थी मात्र गंभीर जखमी झाले आहेत.हल्ली दिवसेंदिवस मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. गाडी किंवा वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेकदा आव्हान देखील करण्यात येते. मात्र याचा कुठेही परिणाम होताना दिसत नाही. हेच या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. डोंगरकडा येथून आखाडा बाळापूर येथे शाळेची रिक्षा आठ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. ऑटो चालकाला त्याच्या फोनवर फोन आला आणि त्याने फोन कानाला लावला तोच त्याचा वाहनावरील ताबा सुटला. ऑटो पुलाच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. तोच ऑटोमध्ये जोरात आवाज झाला.यामध्ये चार विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर आटो चालक ही जखमी झाला आहे. घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना कळतात घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी आटोतील जखमी विद्यार्थी आणि चालकाला आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले आहे. यामध्ये ऑटोचालक संजय प्रमलवाड यांच्या सह श्रद्धा गजानन कोकाटे, गणराज बालाजी शिंदे, तुकाराम राम कल्याणकर, शिवराज बालाजी शिंदे हे विद्यार्थी ७ ते ११ वयोगटातील आहेत. या अपघातामुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले होते.
Users Today : 8