१८८१ मध्ये राज्यात ३१ लाख मराठा कुणबी, ब्रिटिशांनी केलेली जातनिहाय जनगणना, विश्वास पाटील यांचे संशोधन

Khozmaster
2 Min Read

मुंबई: राज्यात सन १८८१मध्ये ब्रिटिश राजवटीत झालेल्या जनगणनेनुसार त्यावेळी ३१ लाख ६९ हजार ७४० मराठा कुणबी असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तब्बल १३ जिल्ह्यांमधील ही आकडेवारी असून, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी ही माहिती समोर आणली आहे. त्यावेळेच्या गॅझिटिअरमध्ये याबाबतची माहिती असल्याचे विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या आकडेवारीनुसार औंरगाबाद जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ८२५ मराठा कुणबी होते, तर पुण्यात चार लाख कुणबी असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

ब्रिटिश राजवटीत जातनिहाय जनगणना

– ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी नुकतेच सन १८८१च्या गॅझिटिअरमधील आकडेवारी समोर आणली आहे.

– त्यावेळी ब्रिटिश इंडिया सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्यात आली होती.

– त्यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांत कुणबी मराठासह इतर सोनार, सुतार, धनगर, हेटकरी, ब्राम्हणांच्या विविध पोटजाती, मुसलमान, ज्यूबाबत सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती यातून समोर आली आहे.

जवळपास चार महिन्यांच्या संशोधनानंतर विश्वास पाटील यांनी ही माहिती प्रकाशात आणली आहे.आकडेवारी

सातारा – ५ लाख, ८३ हजार ५६९,

रत्नागिरी – २ लाख ३ हजार ४०६,

नाशिक – २ लाख ५ हजार ९९,

सोलापूर – २ लाख ८४ हजार २६७,

ठाणे – १५ हजार ३६७,

कोल्हापूर – २ लाख ९९ हजार ८७१(त्यावेळीच्या आकडेवारीनुसार कुणबी समाजाची संख्या)

कोट

ब्रिटिश काळापासून उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा विचार होणे गरजेचे आहे. राज्यासह दिल्ली, विजापूर, हैदराबाद येथील विविध दप्तरखाने, ग्रंथालये, शासकीय कार्यालयातील कागदपत्रे पडताळून या विषयाचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय घेताना, ही सत्य आकडेवारी विचारात घेण्याची गरज आहे.

– विश्वास पाटील

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *