हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने भररस्त्यात संपवलं, बातमी कळताच इतरांनी पेढे वाटले

Khozmaster
3 Min Read

अकोला: अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसत आहे. कारण, रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून संपवल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सुरेश महादेव देशमुख (वय ५५) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो हत्येच्या गुह्यातून नुकताच तरूंगातून बाहेर आला होता. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी हा एक रस्त्यावरील फ्रूट विक्रेता आहे. मृतकाच्या त्रासाला कंटाळून या फ्रूट विक्रेत्यानं त्याला कायमचं संपवल्याचं बोलल्या जात आहे. परंतु देशमुख याची हत्या झाल्याची समजताच काहींनी पेढे वाटून आनंद लुटला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरातील भगतसिंग चौकातील फळविक्रेत्यांसह भाजीपाला दुकान लावण्यावरून तसेच पैसे आणि फळांची मागणीकरून सुरेश महादेव देशमुख हा त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला चौकातील अनेक लोक त्रस्त झाले होते. अनेकदा त्याच्याविरुद्ध पोलिसांत कारवाईसाठी तक्रारी दिल्या होत्या. मुर्तीजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी त्याला बोलावून समजूत काढली. परंतु, त्यांच्यात काही फरक पडला नाही.

शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुरेश देशमुख हा भगतसिंग चौकात आला अन् फळ विक्रेता अब्दुल खालीद अब्दुल मन्नान (वय २४) याला फळाची मागणी करू लागला. फळ द्यायला नकार दिल्याने देशमुखने थेट त्याच्या अंगावर चाकू फेकून मारला. यावेळी फ्रूटविक्रेता थोडक्यात बचावला, त्यानंतर देशमुख मारण्यासाठी त्याच्याकडे धावला, हे पाहताच फ्रुट विक्रेत्यांना त्याने फेकून मारलेला चाकू हातात घेऊन त्याच्यावर वार केले.रक्ताच्या थारोळ्यात देशमुख पडल्यानंतर अब्दुल खालीद अब्दुल मन्नन हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयितांना अटक केली. मात्र, गुन्हेगारीचा फास नाशिक शहराला आवळत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. पण, अवघ्या काही तासातच पोलिसांनी मारेकऱ्याला बाजारातून ताब्यात घेतले. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत वडतकर, पोलिस उपनिरीक्षक वानखडे दाखल झाले होते.

मृतकावर आठ गुन्हे दाखल, हत्येनंतर वाटले पढे

मृतक सुरेश महादेव देशमुख यांच्याविरुद्ध मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात ३०७, २९४ सारखे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. आधीच्या गुन्ह्यात तो सहा वर्षांची शिक्षा भोगून आला होता. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याचा नागरिकांना त्रास होता. देशमुख याच्या कुटुंबात तो एकटाच होता, ना कुठलं मूलबाळ होतं, त्यात पत्नीचं अगोदरच निधन झालं होतं. देशमुख यांच्या हत्येची बातमी समजतात स्थानिक नागरिकांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केलाय.

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *