बईतील हिऱ्यांची बाजारपेठ सुरतला जाण्याचा धोका? नेमका काय परिणाम होणार?

Khozmaster
4 Min Read

मुंबई: मुंबईत एकवटलेला हिरे व्यवसाय सुरतेला नेण्याचा घाट घातला जात आहे. अर्थात, एका शहरातून दुसऱ्या शहरात तो स्थलांतरित करणे इतके हे सोपे निश्चितच नाही. या स्थलांतराला आर्थिक, सामाजिक, भावनिक, राजकीय असे विविध ‘पैलू’ पाडले जात आहेत. या व्यवसायाचे केंद्र असलेला हिरे बाजार स्थलांतरित करणे, याला महाराष्ट्राच्या अस्मितेपासून आर्थिक उलाढालीपर्यंतचे सर्व संदर्भ आहेतमुंबईत हिरे बाजार का?

जगात पाच आघाडीचे हिरे बाजार आहेत. त्यातील सर्वांत जुना हिरे बाजार १९३७ पासून इस्रायलमध्ये आहे. त्यानंतर अँटवर्प (बेल्जियम), लंडन (ब्रिटन), टोरोन्टो (कॅनडा) आणि पाचव्या क्रमांकाचा मुंबई हिरे बाजार प्रसिद्ध आहे. या बाजाराला मोठा इतिहास आहे. तो आधी गिरगावात ऑपेरा हाऊस पंचरत्न इमारत आणि प्रसाद चेंबर्स येथे होता. २५ मजली पंचरत्न इमारत ही जवळ जवळ २५ वर्षे हिरे व्यापाराचे केंद्र होती. आता ती निवासी आहे. ही इमारत पैलू न पाडलेल्या हिऱ्यांच्या आयातीसाठी सोयीची होती. मुंबई हे नैसर्गिक बंदर असल्याने सागरी मार्गाने हिऱ्यांची आयात-निर्यात सोपी असे. यानंतर हिरे बाजार बांद्रा-कुर्ला संकुलात स्थलांतरित झाला. २० एकर भूभागावर भारत डायमंड बोअर्स (बीडीबी) नावाने उदयाला आला. उलाढाल, आयात-निर्यात आणि एकंदर व्यवसाय याबाबत बीडीबी जगातील सर्वांत मोठा हिरे बाजार बनला आहे.सुरतेचे महत्त्व वाढते का?

सन २०१५ मध्ये सुरत डायमंड बोअर्स (एसडीबी) हा हिरे बाजार सुरू झाला. हे जगातील सर्वांत मोठे हिरे व्यापार केंद्र. हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग तेथे एकवटला आहे. जगातील पैलू पाडलेल्या ९० टक्के हिऱ्यांना सुरतेत पैलू पाडले जातात. अँटवर्प ही जगाची हिरे राजधानी मानली जाते. तिथे जगातील पैलू न पाडलेले ८४ टक्के हिरे आणि पैलू पाडलेल्या हिऱ्यांपैकी ५० टक्के हिरे यांचा व्यापार होता. त्या तुलनेत सुरतेतून पैलू पाडलेल्या ९० टक्के हिऱ्यांचा व्यापार होतो. सुरत हे या प्रकारे हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

-दोन्ही बाजारांत फरक काय?

सगळा गोंधळ इथेच आहे. मुंबईचा हिरे बाजार किंवा बीडीबी, हे जगातील सर्वांत मोठे हिरे एक्सचेंज. याचा अर्थ हिऱ्यांची आयात-निर्यात, व्यापार (खरेदी-विक्री), हिऱ्याचे भांडवली मत्ता (कॅपिटल असेट) म्हणून होणारे व्यवहार हे सगळे बीडीबीमधून होतात. त्याच वेळी कच्च्या हिऱ्यांना पैलू पाडणे आणि पैलूदार हिऱ्यांची विक्री हा व्यापार हा मुख्यतः सुरतेतून होतो.-मुंबईवर परिणाम कोणते?

भारत डायमंड बोअर्समध्ये सध्ये २,५०० छोटे-मोठे हिरे व्यापारी आहेत. हिऱ्यांचे कॅरेटनुसार वर्गीकरण, पैलू पाडणे, हिऱ्यांची विक्री या सर्वांवर परिणाम होणार आहे. आज मुंबईत हिरे उद्योगात काम करणाऱ्या अकाउंट एक्झिक्युटिव्ह पदावरील व्यक्तीला सरासरी वार्षिक ४.५ लाख रुपये, तर हिऱ्यांची प्रतवारी ठरवणाऱ्याला सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळते. हिरे बाजार सुरतेत नेल्यास मुंबईत या उद्योगात काम करणारे हजारो कर्मचारी बेरोजगार होऊ शकतील. मुळात सुरतेमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय ऐन भरात असून तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगार आहे. परंतु मुंबईत हिरे उद्योगातून रोजगार मिळालेले बेरोजगार होतील. त्यामुळे हिरे बाजार मुंबईतून सुरतेत स्थलांतरित करण्याला विरोध वाढत आहे. शिवाय, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार मुंबईत असताना हिरे बाजारही मुंबईतच असणे, हे या रोज हजारो कोटींची व्यावसायिक उलाढाल करणाऱ्या आर्थिक राजधानीला सोयीचेही आहे.

-दिसते तसे नाहीये का?

मुंबईतून हिरे बाजार हलवणे हे मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रकार आहे, असे बोलले जाते. यात थोडे जरी तथ्य असेल, तर मग आगामी काळात भांडवल बाजारही गुजरातेत गेल्यास नवल नाही. मुळात व्यवसाय, भांडवल बाजार आणि राजकारण यांची सांगड घालणे व्यापारासाठी घातक आहे. असे पायंडे पडल्यास सत्तांतर झाल्यावर सत्ताकेंद्र ज्या राज्यात असेल किंवा सत्तेतील एखादा सर्वोच्च नेता ज्या राज्यातून येत असेल तिथे महत्त्वाची औद्योगिक व आर्थिक केंद्रे नेली, तर देशाचे सर्वत्र हसे होईल.

0 9 5 0 5 0
Users Today : 81
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *