काम करताना खडीचा टिप्पर अंगावरुन गेला, ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने बाल कामगाराचा करुण अंत

Khozmaster
2 Min Read

अहमदनगर : वाहन चालवत असताना सतर्क राहणे फार महत्त्वाचं असतं. आपल्या चुकीच्या वाहन चालवण्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अत्यंत मोठी दुर्घटना होऊ शकते. जामखेड – सौताडा महामार्गावर अशीच एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगार युवकाचा टिप्परखाली येऊन मृत्यू झाला. या कामगाराच्या अंगावरुन गाडी केल्याने गणेश बापू फुलमाळी (वय २०, रा. कानडी, ता. आष्टी) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आङे..जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्टपणे सुरू आहे. नायरा पेट्रोलपंप रस्त्याच्या समोर कामगार गणेश फुलमाळी हा काम करत होता. पहाटे तीन वाजण्याच्या आसपास रस्त्यावर बसलेला असताना खडीचा हायवा टिप्पर त्या ठिकाणी आला आणि त्याच्या अंगावरुन गेला. यावेळी या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.एवढी मोठी दुर्घटना घडून देखील निकृष्ट दर्ज्याच रस्त्याचं काम सुरूच आहे. या कामावरील अनेक कामगार दारूचे नशेत असतात. तसेच कामगारांकडे सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षित कोणतेही साधन नसतं. यामुळे कामगाराचा बळी गेला आहे. याला जबाबदार ठेकेदार आहे. या ठेकेदारावर योग्य कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. या घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांची टीम दाखल झाली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृत गणेशला तीन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. त्याचे सर्व नातेवाईक, आई-वडील मोठ्या संख्येने सहकारी हे रुग्णालयामध्ये दाखल झाले असून त्यांनी शोक व्यक्त केला.

0 9 5 0 3 2
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *