लोकसभेला भाजपच्या जागा कमी होतील, योगेंद्र यादव यांचा अंदाज, कारणही सांगितलं

Khozmaster
3 Min Read

ठाणे : २०१९ च्या निवडणुकीत भाजपला गुजरात, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जवळपास सगळ्या जागा मिळाल्या होत्या. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. तसेच दक्षिण भारत, बंगालमध्ये त्यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता नसल्याने २०२४ च्या निवडणुकीत त्यांच्या जागा कमी होऊ शकतात, असे मत ज्येष्ठ राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव यांनी शनिवारी ठाण्यात ‘२०२४ च्या निवडणुकीतील आव्हाने’ याविषयावरील व्याख्यानात केले. ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा राबवणे म्हणजे देशाला ‘एक पक्ष, एक नेता’ या स्थितीपर्यंत आणून ठेवण्याची चाल असेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.सावित्रीदेवी थिराणी शाळेत साथी संजीव साने यांचा प्रथम स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी स्वराज इंडिया, महाराष्ट्रचे अध्यक्ष ललित बाबर होते. ॲड.नीता कर्णिकही उपस्थित होत्या. ‘जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. त्यामुळे आदिवासी, दलित, ओबीसी तसेच उच्चवर्णीयांची केवळ लोकसंख्याच नव्हे तर त्यांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती समजून येईल, असे मतही यादव यांनी व्यक्त केले.

‘लोक मला म्हणतात की एके काळी काँग्रेसला विरोध करणारे तुम्ही आज काँग्रेसला पाठिंबा देता. तेव्हा माझे उत्तर असे की माझ्या मुलांचे भविष्य मला सुरक्षित ठेवायचे आहे. १९७७ मध्ये आणीबाणीच्या वेळी जशी वेळ आली होती, तशी वेळ आता आली आहे. त्यावेळी काँग्रेसविरोधात इतर सर्व पक्ष एकवटले होते तसेच आता भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. एक दीड वर्षापूर्वीपर्यंत जे वातावरण होते, ते राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे बदलले आहे. काही काळापूर्वी इंडिया आघाडीतील पक्ष एका खोलीत एकत्र बसूसुद्धा शकत नव्हते, ते आता जागा वाटपापर्यंत एकत्र येताना दिसत आहेत’ असं यादव म्हणालेेभारतातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ‘भारत जोडो अभियान’ सुरू केले आहे. संघ आणि भाजपला विरोध आणि इंडिया आघाडीला पाठिंबा, असे या अभियानाचे मुख्य धोरण आहे. संघ परिवार पक्षाबाहेर राहून भाजपसाठी जे काम करतो, तसेच काम ‘भारत जोडो अभियान’ला इंडिया आघाडीसाठी करायचे आहे. २०२४ ची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात की विरोधी, हा कळीचा मुद्दा असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिलं आहे, ते टिकलं तरच देश वाचू शकेल, असे विचार त्यांनी भाषणात मांडले.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, स्वराज इंडिया चे सुभाष लोमटे , स्वराज अभियान, महाराष्ट्रचे अध्यक्ष मानव कांबळे, मारुती भापकर, इब्राहिम खान, गांधीवादी दामजीभाई गडा, हिरामण पगार, सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, उल्का महाजन, इंदवी तुळपुळे, सुरेखा दळवी तसेच विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच संजीव साने यांचे अनेक स्नेही यावेळी उपस्थित होते.

.

0 9 5 0 0 3
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *