दुष्काळी स्थितीतही सरकारने सुकाळ दाखवला; ६१ टक्के आणेवारी जाहीर, शेतकऱ्यांचा संताप

Khozmaster
3 Min Read

यवतमाळ: जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. हे घडत असतानाच किडीने आक्रमण केले. नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना खरीप हंगामातील पिकांची सरासरी आणेवारी ६१ टक्के जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीतही सरकारने सुकाळ दाखविल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढू लागला आहेजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ३० सप्टेंबरला खरीप पिकांची आणेवारी जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील २,०४६ गावांतील सरासरी आणेवारी ६१ टक्के दाखविण्यात आली आहे. सर्वांत कमी ५४ टक्के आणेवारी दारव्हा तालुक्यातील तर सर्वाधिक ६५ टक्के पुसद तालुक्यातील दाखविण्यात आली आहे. खरीप हंगामातील पिकांची स्थिती दर्शविण्यासाठी महसूल विभागाकडून दरवर्षी आणेवारी जाहीर केली जाते. यातील टक्केवारीवरून राज्यातील दुष्काळी स्थितीचा अंदाज व्यक्त होतो. साधारणत: ५० टक्क्यांवर आणेवारी असल्यास पिकांची स्थिती उत्तम असल्याचे मानले जाते. यातून कमी असल्यास दुष्काळी स्थिती असल्याचा सर्वसाधारण समज आहे. ही आणेवारी काढण्याची पद्धत जुनाट असल्याने दुष्काळी स्थिती असली तरी सुकाळ दिसतो, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आणेवारी अधिक असल्याने दुष्काळी परिस्थितीतील लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना अजूनही शासनाने मदत दिली नाही. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यात शेतकरी भरडले जात असताना खरीप पिकांची आणेवारी ६१ टक्के काढून शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दाखविणे हे गंभीर आहे,’ असा संताप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणी काँग्रेस देवानंद पवार यांनी व्यक्त केला आहे.- १६ तालुक्यांतील १ हजार ५५६ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला.

– २ लाख ८८ हजार ७३ शेतकऱ्यांना झळ पोहचली.

– २ लाख ६४ हजार ९८८ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.

– प्रशासनाने मदतीसाठी २३६ कोटी ३० लाख रुपयांची मागणी सरकारकडे केली.

– पण याच महसूल विभागाने खरीप पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दाखविले.गोंदिया : जिल्ह्यातील चार गावांची आणेवारी ५० टक्क्यांखाली तर ९१५ गावांची आणेवारी ५० टक्क्यावर असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. ३६ गावांची आणेवारी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. ५० टक्क्यांच्या वर आणेवारी असलेल्या गावांचा विचार करता गोंदिया तालुक्यात १४९, गोरेगाव ९४, तिरोडा १२३, अर्जुनी मोरगाव १४८, देवरी १३५, आमगाव संपूर्ण ८३ गावे, सालेकसा ८६ तर सडक-अर्जुनी तालुक्यातील १०४ गावांचा समावेश असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

0 9 4 9 9 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *