एकटाच खातो का. मराठ्यांनी बळ देण्याचं काम करू नये, जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर टीका

Khozmaster
3 Min Read

जालना : मराठा आरक्षणासाठी व्यापक लढा उभारलेले आणि उपोषण मागे घेऊन महाराष्ट्राच्या गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. आपला ओबीसी समाज ६० टक्के आहे. अजिबात त्या छगन भुजबळला ताकद देऊ नका… त्याला एकट्यालाच खायचंय सगळं… अशा शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळांवर तोंडसुख घेतलं.आंतरवाली सराटी इथलं उपोषण मागे घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला एक महिन्यांचा अवधी दिला आहे. दरम्यान, राज्यातल्या गाव खेड्यांमध्ये जाऊन मराठा समाजात आरक्षणविषयक लढा तीव्र करण्याचा संदेश ते देत आहेत. यानिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन करून मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हिंगोलीत जरांगे पाटील यांची सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

अनेक जातींमधल्या पोट जातींना आरक्षण दिले गेले आहे. त्याप्रमाणेच मराठा ही जात कुणबींची पोट जातीचा घटक होऊ शकणार नाही का? यासाठी कोणत्याही दस्तावेजाची गरज भासणार नाही. फक्त राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे. मराठा समाजाने छगन भुजबळला बळ देण्याचे काम करू नये. त्याला एकट्यालाच खायचंय सगळं… अशा शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली.आतापर्यंत ज्यांनी आरक्षणाचे लाभ घेतले त्यांच्याकडून कसलेही पुरावे घेतले नाही. एका गावात एकाचा जरी पुरावा आढळून आला, तर संपूर्ण गावाला ओबीसी प्रमाणप्तर द्यावेच लागतील. सरकारमधील प्रतिनिधींनी सांगितलं होतं की, आरक्षण मिळवण्यासाठी काही निकष आहेत, काही आधार लागतो, पुरावा मांडावा लागतो. आता पाच हजार पुरावे आढळून आले आहेत.आता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मागील अनेक वर्षापासून मराठा समाज हा इतर सर्व पक्षांना मोठं करायचं काम करतो. आज त्यांची खरी गरज मराठा समाजातील येणाऱ्या पिढीसाठी आरक्षणाची मूलभूत गरज आहे. त्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. मग पुढाऱ्यांनी आरक्षण न देण्याचा विडा उचलला काय? असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे.छगन भुजबळ हे मराठा बांधवांना आरक्षण मिळू नये याची स्वप्न बघत आहेत तर यासाठी मराठा समाजाने आपल्यामधील हेवेदावे मतभेद मनभेद बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येऊन ही हक्काची लढाई आता लढली पाहिजे. ते एक प्रकारे ओबीसी समाजाच्या पाठीशी राहून ओबीसीचा नेता मानतात, त्याच प्रकारे आता मराठा बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. आरक्षणासाठी तरी सर्वांनी एकत्र राहायला हवे, असे जरांगे पाटील म्हणाले.

0 9 4 9 8 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *