जायकवाडी’चे पाणी पेटणार! नाशिक-नगरमधून विसर्गाला विरोध कायम, राजकीय हस्तक्षेप वाढला

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहातील ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश आहेत. पण, दोन्ही जिल्ह्यांतून विरोध सुरू झाला आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून, राजकीय हस्तक्षेपही वाढला आहे. मराठवाड्यातून राजकीय पक्ष-संघटनांनी पाठपुरावा केला नसल्यामुळे पाणी सोडण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.राजकीय नेत्यांचा विरोध

मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद झाले असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर पुन्हा प्रादेशिक संघर्ष सुरू झाला आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे; तर राजकीय नेत्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहातून सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याची नासाडी होण्याची शक्यता आहे. परिणामी, धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई भेडसावणार आहे.

नगर, नाशिकमध्ये आंदोलननगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडू नये, अशी मागणी भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. नेवासा, कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. नाशिक जिल्ह्यातूनही विरोध वाढला आहे.

राजकीय ऐक्याचा अभाव

पश्चिम महाराष्ट्रातून राजकीय दबाव वाढलेला असताना मराठवाड्यातून मात्र पाणी सोडण्यासाठी राजकीय पाठबळ मिळत नसल्याची स्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी या एकमेव पक्षाने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीही जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत लढा उभारण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली नसल्यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा तिढा सुटलेला नाही.रब्बीसाठी पाण्याची मागणी

रब्बी हंगामात जायकवाडी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, तीन पाणी पाळ्या देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्हे जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे असल्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना आम्ही पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन दिले. नाशिकच्या मुख्य अभियंत्यांना कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अंमलबजावणी झाली नसल्यामुळे राजकीय पक्ष, संघटनांनी दबावाची भूमिका घेण्याची गरज आहे.- महेश निनाळे,मराठवाडा मुख्य संघटक, वंचित बहुजन आघाडी

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *