आधी कारखान्यात धोबीपछाड, आता ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

Khozmaster
1 Min Read

शिर्डी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी एन्ट्री करून तीन ग्रामपंचायती खेचून विखेंना ‘जोर का झटका’ दिलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील कोपरगाव मतदासंघात असलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाचं गाव पुणतांबा ग्रामपंचायतीमध्ये देखील भाजप विखे पाटील गटाला मोठा धक्का देत भाजपच्या कोल्हे गटाने विजय संपादित केलाय. राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीपैकी ०९ ग्रामपंचायत भाजप विखे गट तर ३ ग्रामपंचायतीत विखे पाटलांची सत्ता संपुष्टात आणत कोल्हे गटाने विजय मिळवत गणेश कारखाना निवडणुकीपासून आपला विजयाचा करिश्मा कायम ठेवलाय.अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी आणि चितळी या तीन ग्रामपंचायतीत भाजपचे विवेक कोल्हे यांचे पॅनल निवडून आले आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यात भाजपचे विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी आघाडी करत विखे पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर आता तीन ग्रामपंचायती कोल्हेंनी आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. या तीनही ग्रामपंचायती कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील असून त्यांचा राहाता तालुक्यात समावेश आहे.

या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पुणतांबा येथे संप करणारी कृषीकन्या आदिती जाधव ही देखील विजयी झाली आहे. पुणतांब्यात विवेक कोल्हे आणि धनंजय जाधव यांचे विकास पॅनलला जनतेने कौल दिला असून या पॅनलने कोपरगावचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांचे लोकसेवा आणि विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलला पराभूत करत दोघा दिग्गजांना मोठा धक्का दिलाय.
0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *