बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत राज्यातील युवक आत्महत्या करत आहेत. बीड जिल्ह्यातील आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी २७ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे शत्रुघ्न याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी बोलणं करून दिले होते . घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे.
Users Today : 1