मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक; रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं?

Khozmaster
1 Min Read

जालना: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात मराठा बांधवांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रम सुरू असताना कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळापासून दूर करत परिस्थिती आटोक्यात आणली.जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणामध्ये मेरा माटी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्रितपणे येऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत केंद्रीय राज्यमंत्रांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्वरीत मराठा समाज बांधवांना कार्यक्रम स्थळापसून दूर करत परिस्थिती आटोक्यात आणली.मराठा समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा तीव्र निषेध केला आहे. एकीकडे मराठा बांधवाची चिता जळत असताना अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे उचित नाही, असे म्हणत मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान मराठा समाजाला सरकारने मागितलेली मुदत संपण्यासाठी आता ४ ते ५ दिवस उरले असून अद्यापही सरकारने मराठा आरक्षणाना विषयी कुठलाही निर्णय दिला नसल्याने आता मराठा समज आक्रमक होत असून तीव्र निषेध नोंदवत आहे.

0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *