मुलगा घरातून गेला अन् काही वेळाने थेट मृत्यूचीच बातमी धडकली; धक्क्याने आईची तब्येत बिघडली!

Khozmaster
1 Min Read

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीत राहणाऱ्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेनंतर प्रभाकर कॉलनीसह शहरातील रहिवाशांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत इयत्ता ११ वीमध्ये शिकत होता. सकाळच्या सत्रात तो वर्गात बसला. मात्र दुपारी दीडच्या सुट्टीत महाविद्यालयात न जात घरी जेवण करून बाहेर जाण्याचे त्याने नियोजन केले. मयत निखील राजपूत याने घरी जेवण केल्यानंतर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतलं त्यानंतर आणि नवापूर तालुक्यातील भवरे धरणावर चार वर्गमित्रांसोबत फिरण्यासाठी गेला.

निखील धरणात आंघोळ करीत असताना पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. वर्गमित्रांना पाण्यात पोहता येत नव्हते. त्याला वाचण्यासाठी काही वेळातच जवळील गुराख्याची मदत घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. तसंच लगेच उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तिथे तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तरुण मुलाच्या मृत्यूने राजपूत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रूग्णालयात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली.

दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी मिळतात आईबाबांनी प्रचंड आक्रोश केला. पोटचा गोळ्यावर काळाने घाला घातल्याने आईची तब्येत बिघडली. त्यांच्यावर देखील नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत.

0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *