शेतकरी असल्याने लग्न जुळत नाही; तणावातून तरुणानं घर सोडलं, नंतर कुटुंबाच्या आक्रोशानं गाव हळहळलं

Khozmaster
1 Min Read

जळगाव: शेतकरी आहे म्हणून लग्न होत नाही. लग्न होत नसल्याने आपल्याला जीवन जगावेसे वाटत नाही, अशा जीवनाला काय अर्थ या विवंचनेत चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील शेतकरी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत भगवान पाटील (२४, पिलखेडा ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत पाटील हा परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपयोग नाही. असे एका नातेवाईकाला योगेश यांनी बोलून दाखविले होते. याच विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता ही घटना समोर आली.

घरातून बाहेर पडलेला प्रशांत कुठे गेला. म्हणून कुटुंबियांनी शोध सुरू केला असता प्रशांत याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक नरवाडे करत आहे.
0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *