पाचशेच्या नोटा १००,२०० रुपयांत कन्व्हर्ट करुन ठेवा, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा नोटबंदी: प्रकाश आंबेडकर

Khozmaster
3 Min Read

धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आहे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत आहे. तसेच भाजप आहे कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

भाजपा व आरएसएस हे जाती जातीमध्ये भांडण लावून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसींमध्ये तर आदिवासींचा कोळ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात आदिवासी एल्गार परिषदेत केला आहे. युद्धामध्ये ज्याप्रमाणे सैन्य आपापल्या बॉर्डरवर उभ राहते, त्याप्रमाणेच जाती जातीच्या नावावर सीमांवर हे सरकार भांडण लावून उभे करत असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी व संघावर निशाना साधला आहे.
ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी आहे. त्याचबरोबर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले

भाजपच्या धोरणांमुळेच आरक्षण वाद’

‘मराठा, धनगर आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून, तर धनगरांना अनुसूचित जमातीमधून आरक्षण हवे आहे. याला विरोध म्हणून मराठ्यांविरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध एस. टी. असा वाद सुरू झाला आहे. यामागे भाजपचे आरक्षणविरोधी राजकारणाचे धोरण आहे,’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आरक्षण मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी स्वतंत्र तरतूद शासनाने करावी, अशी भूमिकाही मांडली.

अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अॅड. आंबेडकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील मूलभूत सुविधांवर प्रकाश टाकला. अकोला-अकोट व अकोला-तेल्हारा रस्त्याची झालेली चाळणी, वाढते अपघात, शंभरावर गेलेले जीव याकडे लक्ष वेधून भाजप नेत्यांना याबाबत जनता कधी जाब विचारणार, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर त्यांनी टीका केली.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *