कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा, राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट

Khozmaster
2 Min Read

सोलापूर : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील अडीच ते तीन तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी, ज्वारीसह रब्बीसाठी होणार लाभ

सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पहाटेच्या वेळी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ज्वारीसह रब्बी हंगामातील सर्व पीकांना फलदायी ठरणारा असा आहे. तर, द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी मात्र काहीसा नुकसानकारक ठरणारा आहे. सोलापूरात या पावसाची नोंद २८ मि.मी. इतकी झाली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी उजाडेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. काही भागात वीजेच्या कडकडासह पाऊस झाला तर काही भागात मध्यम व हलक्या स्वरुपात पाऊस झाला आहे. दक्षिण, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढासह अन्य तालुक्यातही हा पाऊस झाला आहे.

बुधवारी सकाळपासून ही ढगाळ वातावरण कायम असून काही भागात सकाळीही पाऊस झाला आहे. येत्या दोन-चार दिवसात अशा स्वरुपाचा आणखी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाअभावी रब्बी पेरण्या पूर्ण क्षेत्रावर झाल्या नाहीत. ज्यांनी पेरणी केली त्यांची उगवणही पूर्णता झाली नाही अशी स्थिती आहे. हा पाऊस ज्वारी व रब्बीच्या अन्य पिकांसाठी पोषक ठरणारा आहे.आणखी एखादा मोठा पाऊस झाल्यास उशीरानेही रब्बीच्या पेरण्या होतील अशी शक्यता आहे. तसेच खरीपाच्या तूर पिकासाठीही हा लाभदायक ठरू शकतो. द्राक्ष छाटणी केलेल्या बागा सध्या फुलोरा स्वरुपात आहेत. त्यामुळे पावसाच्या तडाख्याने त्याची गळती होवू शकते. तसेच औषधाच्याही फवारण्या वाढून यामुळे खर्च वाढतो असं शेतकऱ्यांनी सांगितलंकोल्हापूरात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याची माहिती आहे. आदमापूर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस झाला अचानक पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ झाली. तर मळणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. कोल्हापूरमध्ये मागील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात पाऊस झाला. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली. साताऱ्यात देखील दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता.

0 9 4 8 8 0
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *