मराठा VS ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर, मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेले: संजय राऊत

Khozmaster
2 Min Read

मुंबई: राज्यात सध्या मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमनेसामने आले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा नेत्यांना ओबीसी नेत्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले असून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा VS ओबीसी मुद्द्यावरुन राज्य मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होतेयावेळी संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटले की, मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर सुरु आहे. मला तर वाटतं एखादा मंत्री बैठकीत मार खाईल, असं वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जातात. यापूर्वी राज्यात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यावर कोणतही नियंत्रण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.दिल्लीतील एका कार्यक्रमात गातानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याविषयी संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की एखाद्या राजकीय नेत्याच्या अंगात एखादी कला असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो म्हणून काय झाले? देवेंद्र फडणवीस चांगले गातात हे मला माहिती आहे, त्यांची पत्नीही चांगली गाते. देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं गात असतीलतर आपण ऑल पार्टी ऑर्केस्ट्रा ठेवुयात, अशी मिश्कील टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

१ डिसेंबरपासून राज्यव्यापी साखळी उपोषण: मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची गुरुवारी घोषणा केली. त्यानुसार मनोज जरांगे राज्यभरात पुन्हा दौरे करणार आहेत. तसेच मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषण कार्यक्रमाची घोषणा केली. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील एकही गाव असं राहणार नाही की, जिथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु नसेल. त्याची तयारी आतापासूनच सुरु करावी, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच आमच्या दौऱ्यांसाठी किंवा मराठा आंदोलनाच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नका. आमचे दौरे आणि सभांसाठी येणारे लोक स्वत:च्या पैशांनी येतात. आमचे डिझेलचे पैसेही आम्हीच भरतो. हे आंदोलन पैसे कमावण्यासाठी नव्हे तर सामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

0 9 4 8 6 6
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *