मुंबईच्या वेशीवर वाहनांची धुलाई, धावत्या वाहनांवर ‘हाय जेट प्रेशर’ मशिनने पाणी फवारणार

Khozmaster
2 Min Read

, मुंबई: मुंबईतील धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. यामध्ये आता मुंबईतील चेक नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर पाणी फवारणी करण्याचा नवा उपाय़ शोधून काढण्यात आला आहे. वाहनांच्या या धुलाईसाठी ‘हाय जेट प्रेशर’ मशिन बसवण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. ‘येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल’, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत आहे. यामध्ये वाहनांमुळे होणारी धूळ रोखण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांवर आच्छादन घालावे, बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रिज) ने-आण करणारे वाहन झाकलेले असावे, बांधकाम राडारोडा ने-आण करताना प्रत्येक खेपेला पाणी फवारणी करावी, तसेच वाहनांची चाके प्रत्येक खेपेनंतर धुवून स्वच्छ केली जावीत, अशा सूचनांचा समावेश आहे. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आणखी एक पर्याय निवडला आहे.मुंबईत मोठ्या संख्येने वाहने प्रवेश करतात. यामध्ये मालवाहतुकीसोबतच अन्य खासगी वाहनांचाही समावेश असतो. महानगरातील कानाकोपऱ्यातून दिवसभरात हजारो वाहने येतात. काही मालवाहनांतूनही धुळीचे प्रदूषण होते. यामुळे मुंबईतील चेक नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर पाणी फवारणी करण्यात येणार आहे. तेथे हाय जेट प्रेशर मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली. दिवसाला दहा ते वीस हजार ट्रक, टेम्पो, कंटेनर मुंबईत प्रवेश करतात. याशिवाय अन्य खासगी वाहनांचाही समावेश होतो. अशा वाहनांमुळे वायू प्रदूषणाबरोबरच धूळ प्रदूषणही होते. या वाहनांवर बरीच धूळही असते. त्यामुळे हा पर्याय निवडण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. ‘या उपायामुळे मुंबईत प्रवेश केलेल्या वाहनांमुळे धूळ प्रदूषण होणार नाही. दोन ते तीन दिवसांत यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करून या कामाला गती दिली जाणार आहे. चेक नाक्यांवर साधारण तीन ते चार हाय जेट प्रेशर मशिन बसवण्यात येतील’, असे चहल म्हणाले.

वाहनांची संख्या वाढतीच

मुंबईत सध्याच्या घडीला ४४ लाखांहून अधिक वाहने आहेत. यामध्ये २६ लाखांपेक्षा अधिक दुचाकी, तर उर्वरित चार चाकी आणि अन्य वाहने आहेत. गेल्या एक ते दीड वर्षात दीड लाखांहून अधिक नवीन वाहनांची भर पडली आहे. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीतही दररोज नवीन वाहनांची भर पडत असल्याने वायू प्रदूषण आणि धूळ प्रदूषणाचेही प्रमाण वाढण्याची शक्यता अधिकच आहे.

0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *