पुणे टू अमरावती रंगली प्रेमकथा, प्रेमात लग्नाच्या आणाभाका; नंतर जे घडलं ते धक्कादायक

Khozmaster
2 Min Read

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील असलेली तरुणी अमरावती शहरात भाड्याच्या घरात राहत होती. यादरम्यान, तिचे प्रेम एका पुण्याच्या मित्रासोबत जडले. दोघांनी भविष्याचे स्वप्न रंगवले. प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर सुरू झाला तरुणीचा छळ आणि यातूनच प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीने भाड्याने राहत असलेल्या घरातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मृतक तरुणीच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संजय जाधव (रा. पुणे) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली ही तरुणी अन्य एका मैत्रिणीसोबत राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी भाड्याने राहत होती. त्यानंतर तिची संजय जाधव नावाच्या मुलाशी ओळख झाली. या ओळखीतून संजयने तिला प्रेमच्या जाळ्यात अडकवले. तिचा गैरफायदा घेऊन तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे ती अलिकडे मानसिक तणावात राहू लागली.अशातच तिने खोलीवर मैत्रिण नसल्याचे पाहून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यावर तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत तिच्या वडिलांना कळविण्यात आले, त्यानंतर त्यांनी अमरावती गाठले.

आपल्या मुलीने टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्यावेळी खोलीवर राहणाऱ्या मैत्रिणीने त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. संजय जाधव यानेच तिला प्रेमजाळ्यात फासले. तिचा गैरफायदा घेऊन तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिने आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून आरोपी संजय जाधवविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0 9 4 8 4 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *