आरोपींनी कारागृहाचे गज कापले; अन् चार कैद्यांचे पलायन, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Khozmaster
1 Min Read

अहमदनगर: वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. यानंतर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून ४ गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात असलेल्या कारागृहातून चार आरोपींनी सकाळी पावणे सातच्या सुमारास कारागृहाचे गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना उपकरागृहातील गज कापून बलात्कार, खून अशा गंभीर गुन्ह्यातील ४ आरोपींनी आज जाड गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संगमनेर पोलीस सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे असे जेलमधून पसार झालेल्या आरोपींची नावे असून आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ पथके रवाना केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे.जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली आहे. कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने ४ जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सकाळी उजेड पडल्यानंतर चार आरोपी सहजासहजी पळून जाऊ शकत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *