शासन आपल्या दारी’ दावा फोल, पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी शेतकऱ्यांचा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या

Khozmaster
2 Min Read

लातूर : यंदा पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. परंतु पीक विम्याची अग्रीम रक्कम देऊन दिवाळीचा सण गोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले, तसे आदेशही निघाले मात्र दिवाळी सुरु झाली तरी या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम तात्काळ मिळावी यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु त्यांच्या तोंडाला प्रत्येक वेळी पानं पुसण्याचं काम केलं जातंय. शासन आपल्या दारी म्हणत सरकार जनतेच्या सेवेत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र शेतकरी ऐन सणात शासनाच्या दारात ठिय्या मांडून बसलेत. पण त्यांना भेटायला कोणी अधिकारी नाहीत. त्यामुळे सरकार आहे तरी कोणासाठी? शेतकऱ्यांप्रति इतकी असंवेदनशीलता का? असा सवाल उपस्थित होत आहे.लातूर जिल्ह्यातील शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले पण त्यांना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा अन्य कोणी अधिकारी चर्चा करून आश्वस्त करायला तयार नव्हते. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोसळत आहे, अशा परिस्थितीत सरकारने काही मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असते परंतु सरकार सुलतानी होऊन शेतकऱ्यांवर अत्याचारच करत असल्याची भावना शेतकऱ्यांची होत आहे.अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी खचला जातोय. त्यामुळेच तो आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुल्तानी संकट कारणीभूत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सरसकट पीक विम्याची अग्रीम रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *