दिवाळीच्या सुट्टीत शेगावला जाताना अनर्थ, तीन मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा: एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघातच्या घटना कमी होत नसताना आता जिल्ह्यातील महामार्गावर देखील अपघातांची संख्या वाढू लागली आहे. खासगी बसने एका दुचाकीस्वाराला चिरडलेने आणि भर दिवाळीत अपघात घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघात व त्यावरील दुचाकीचे अपघाताचा प्रश्न येरणी वर आला आहे.

आज भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पंधरा दिवसांची दिवाळीची सुटी असल्याने ते शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला.

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ Hr ०१ J ७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने MH ०५ bs ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे जळगाव) शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनासथळावर मृत्यू झाला. कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला.

अपघातात प्राण गमावलेल्या दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले. घटनास्थळी ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे, नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय निबोळकर, विक्रम राजपूत, अनिल खंडारे, गोरानी वेरुळकार यांनी मदत केली. स्वप्नीलचे दीड वर्षांपूर्वीच झाले लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 9 4 8 2 4
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *