अतुल भातखळखरांच्या विरोधामुळे कांदिवलीत छटपूजेला परवानगी नाकारल्याचा आरोप, काँग्रेसने लढाईसाठी दंड थोपटले

Khozmaster
1 Min Read

मुंबई: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या छटपूजेच्या आयोजनावरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठोकले आहेत. पालिका प्रशासनाने कांदिवली येथे छटपूजेला परवानगी नाकारल्याने मुंबई काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही याच ठिकाणी छटपूजेचे आयोजन करणार, अशी ठाम भूमिका पक्षाच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी बुधवारी जाहीर केली. तसेच स्थानिक भाजप आमदाराच्या दबावामुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात मागील १० वर्षांपासून काँग्रेसचे माजी नगरसेवक राजपत आणि अजंता यादव हे दाम्पत्य त्यांच्या राजपत सेवा मंडळातर्फे छटपूजा आयोजित करतात. भाविकांना दूर समुद्रकिनारी जाऊन पूजा करावी लागू नये, यासाठी त्यांनी या उद्यानात सात छट कुंड उभारली आहेत. यंदाही छटपूजेच्या आयोजनासाठी त्यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती. ६ नोव्हेंबरला पालिकेने परवानगी दिल्यावर त्यांनी अनामत रक्कम म्हणून एक लाख रुपयेही भरले. त्यानंतर अचानक पालिकेने राजपत सेवा मंडळाला परवानगी नाकारली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून ही परवानगी नाकारल्याचा मुंबई काँग्रेसचा आरोप आहे.
‘भाजप आणि शिंदे सरकार त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी नागरिकांच्या श्रद्धेशी खेळ करत आहे. रामलीलेच्या वेळीही सरकारने रावणवध एक दिवस आधीच करायला सांगितला. आता छटपूजेतही सरकार विघ्न आणत आहे. पण काँग्रेस या धमकावणीला घाबरणार नाही. आम्ही छटपूजा तिथेच आयोजित करणार’, असे गायकवाड यांनी याबाबत भूमिका मांडताना नमूद केले.
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *