मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Khozmaster
2 Min Read

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना १४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास भवानी मंदिर ते जामगव्हाण पाटी दरम्यान घडली.वारंगा फाटा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ या मार्गावरून अविनाश बाबुराव जाधव (रा. पेवा तालुका हदगाव, जिल्हा नांदेड) हा भाऊ देवानंद संजय जाधव याच्यासोबत बाईकने निघाला होता. पुणे येथून मित्राच्या लग्नासाठी हदगाव तालुक्यातील पेवा येथे ते जात होते.

जामगव्हाण पाटी नजीक येताच पाठीमागून भरधाव वेगाने ट्रक क्रमांक जी. जे. ०३ बीडब्ल्यू ८५३१ च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून मोटर सायकलला जोराची धडक दिली. यात मोटरसायकल क्रमांक एम. एच १४ के. एम. ३१५९ वरील अविनाश जाधव हा जागीच ठार झाला. तर देवानंद हा दूर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.अपघात करून ट्रक फरार होत असताना वारंगा फाटा येथे पोलीस मदत केंद्राचे जमादार शेख बाबर यांनी पाठलाग करून जातीपाती नजीक ट्रक पकडून पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे आणला. घटनास्थळाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ ची साईड पट्टीची दबई व लेवल व्यवस्थित न केल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याची व साईड पट्ट्याची पाहणी करून कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. सदरील घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बदनापूर यांनी भेट दिली. तरुणाचा मृतदेह डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 9 4 7 8 6
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *